HW News Marathi
महाराष्ट्र

विठ्ठल पुजेचा मान कुणाला मिळणार?

मुंबई | मराठा मोर्चाचे आंदोलक आक्रमक झाल्यामुळे आषाढी एकादशी निमित्त पंढपूर येथे होणा-या विठ्ठलाच्या शासकीय महापुजेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना येऊ देणार नाही असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमिवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या पुजेला पंढरपूरमध्ये उपस्थित न रहाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा विठ्ठलाची पूजा कोण करणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, या वर्षी आषाढी एकादशीनिमित्त आयोजित पांडुरंगाची पूजा ‘मानाचे वारकरी’ करतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच पालकमंत्री आणि जिल्हाधिकारीही या पूजेला उपस्थित राहतील, असेही आवर्जून देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीची परंपरा 700 वर्षांपासून आहे. या वारी परंपरेला छत्रपती शिवाजी महाराज यांनीही सरंक्षण दिले होते. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र, या पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात येऊ देणार नसल्याची भूमिका मराठा समाजातील आंदोलकांनी घेतली आहे. त्यानंतर, पंढरपूरमधील वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन मी विठ्ठल पूजेला जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच मी पूजेला जाणार नाही, पण माझ्या घरी विठ्ठलाची पूजा करेन, असेही फडणवीस यांनी म्हटले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटीची मदत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

News Desk

फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं, भाजपचा हल्लाबोल

News Desk

सुशांत प्रकरणी पार्थ पवारांनी ट्विट का केले यावर फडणवीसांनी दिले हे उत्तर

News Desk
मुंबई

मोदीविरोधात लिखाण करणे महागात, पोलीस निलंबित

News Desk

मुंबई: देशात लोकशाही अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडावा, असे काहीसे उदाहरण घडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर लिखाण केले म्हणून एका पोलीसाला निलंबित करण्यात आले आहे. रमेश शिंदे असे या पोलिसाचे नाव असून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील आहे. या कारवाईचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबवण्याचा प्रयत्न या सरकारकडून सुरू असल्याचे हे आणखी एक उदाहरण म्हणावे लागले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर लिखाण केल्याच्या कारणावरून जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी शनिवारी निलंबनाची कारवाई केली. शिंदे हे अनेक वर्षांपासून माजी मंत्री थोरात यांचे अंगरक्षक म्हणून काम करत आहेत. शिंदे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवरुन मोदींविरोधातील लिखाणाचा मजकूर अनेक ग्रूपवर पाठवल्याच्या तक्रारीनंतर सायबर विभागाने याप्रकरणाची चौकशी केली. मोदीविरोधातील मेसेज शिंदे यांच्या मोबाईलवरुन व्हायरल झाल्याचं आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Related posts

परळमधील महाराष्ट्र गेस्ट हाऊसच्या इमारतीला आग

swarit

मुंबईतील अनेक हॉटेलमधे ग्राहकांची फसवणूक !

News Desk

पाईपलाईन फुटली , दोन मुलांचा मृत्यू

News Desk