HW News Marathi
व्हिडीओ

‘मुख्यमंत्र्यांनी पैसे खाल्ले म्हणून मुंबई पावसात बुडाली’; Kirit Somaiya यांचा गंभीर आरोप

बई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केलेत. यशवंत जाधव यांनी छगन भुजबळ यांनाही मागे टाकलं. जाधव यांनी 100 कोटींची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. 100 रुपयांचा शेअर 10 हजार रुपये कोलकाताच्या कंपनीने घेतले, तर 100 कोटींचे शेअर आर्मस्ट्राँग कंपनीच्या खात्यात आले, असं सोमय्या म्हणाले. यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचे शागिर्द आहेत, असं सोमय्या म्हणाले. 2020 मध्ये काही लाखात ही कंपनी जाधव कुटुंबाच्या नावावर झाली. यात 100 कोटी रुपयांचा अपहार झालाय. घाटकोपर, हिंदमाता इथल्या नाले सफाईच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे मुख्यमंत्र्यांनी खाल्ले आणि त्यामुळे मुंबई पावसात बुडाली असा गंभीर आरोप करत सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवलाय.

#KiritSomaiya #SanjayRaut #Shivsena #UddhavThackeray #SharadPawar #BJP #Shivsena #YashwantJadhav

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut On Ayodhya Verdict And Maharahstra | पहले मंदिर फिर सरकार!!!

Arati More

Balasaheb Thorat,Sharad Pawar Baramati | सत्तास्थापनेसाठी आज बारामतीतं थोरात आणि पवारांची खलबतं…

Arati More

आम्ही पक्ष म्हणून तरुणांमध्ये एक सकारात्मक पर्याय नेत आहोत – अमित ठाकरे

News Desk