HW News Marathi
कृषी

बोंड अळी प्रादुर्भावामुळे तीन कंपन्यांवर गुन्हा दाखल

अमरावती | तीन बियाणे कंपन्यांच्या कापसाच्या वाणांवर १०० टक्के बोंड अळीचा प्रादुर्भाव असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. शेतकऱ्यांनी फुलांवर बोंड अळी दिसल्याच्या तक्रारी पंचायत समितीकडे केल्या. या तक्रारींनंतर बेनोडा पोलिसांनी संबंधित कंपन्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुका कृषी कार्यालयात आंदोलन केले. त्यानंतर मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

प्राथमिक पाहणी अहवालात जिल्हास्तरीय समितीने संबंधित कंपन्यांच्या वाणांवर १०० टक्के बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निरीक्षण नोंदवले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन केल्यानंतर अंकुर सीडस प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, बायर बायोसायन्स प्रा. लि. माधापूर हैदराबाद, राशी सिडस प्रा. लि. अत्तुर, तामिळनाडू कारवाई करण्यात आली. राज्यात पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून अशा प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘हुमनी’ अळीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ 

News Desk

पंतप्रधान मोदी साधणार शेतक-यांशी संवाद

News Desk

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत योजनेसाठी विविध घटकांनी 31 जुलै पर्यंत नोंदणी करा – कृषी विभागाचे आवाहन

News Desk
मनोरंजन

बिग बींचा शेतकरी व शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

News Desk

मुंबई | बॉलिवूडचा महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांनी कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेल्या शेतकरी आणि देशासाठी शहीद प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांच्या कुटुंबांना मदत केली आहे. बिग बी यांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांना दीड कोटी रुपयांची मदत देणार असल्याची ‘कौन बनेगा करोडपती’च्या दहाव्या पर्वाच्या सोहळ्यात त्यांनी या संदर्भाची घोषणा केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करणार असून सरकारकडून आम्हाला ४४ शहीद जवानांच्या कुटुंबांची यादी मिळाली आहे. या कुटुंबामध्ये डिमांड ड्राफ्ट तयार करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. यात शहीद जवानाच्या पत्नीला ६० टक्के मदत तर, प्रत्येकी २० टक्के मदत त्यांच्या आई आणि वडिलांना दिली जाणार आहे.

Related posts

नाताळसाठी बाजारपेठ सज्ज

News Desk

मकरसंक्रांतीशी स्त्रिया-नवजात बालकांचे विशेष नाते

News Desk

नेहरु सेंटरमध्ये निसर्ग चित्रांचे प्रदर्शन

News Desk