HW News Marathi
कृषी

योगी म्हणतात ऊसाचे पीक घेऊ नका, डायबेटीस होईल

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला आहे. साखरेमुळे डायबेटीस होतो, त्यामुळे ऊसाचे पीक घेऊ नका अन्य कोणतेही पीक घ्या, असा सल्ला योगी आदित्यनाथ यांनी शेतकयांना दिला आहे. दिल्ली- सहारनपूर महामार्ग कामाच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम बागपत येथे पार पडला. उत्तर प्रदेशातील पश्चिम भागात ऊसाचे उत्पादन सर्वाधिक आहे. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना ऊसाचेच पीक न घेता इतर कोणतेही पीक घ्यावे, असा सल्ला दिला आहे.

ऊसाचे उत्पादन जास्त घेतल्याने साखरेच्या उत्पन्नात वाढ होईल ज्यामुळे डायबेटीस होऊ शकतो. त्यामुळे आता ऊसाचे पीक न घेता भाजीपाल्याचे उत्पादन घेतले पाहिजे, असेही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे सरकारने ऊसाचे २६ हजार कोटी रुपये वितरीत केले आहेत. उर्वरित १० हजार कोटी लवकरच दिले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कृषी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार- पणनमंत्री सुभाष देशमुख

News Desk

माझं मत- तुमच्या शहरातील एटीएममध्ये पैसे आहेत का ?

News Desk

शेतमालास शाश्वत बाजारपेठ व अधिकचा बाजारभाव मिळवून देऊ | शरद पवार

News Desk
क्राइम

Koregaon Bhima Violence | पाचही आरोपींच्या नजरकैदेत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ

swarit

नवी दिल्ली | भीम-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील पाचही आरोपींच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली. या आरोपींच्या नजरकैदेत १७ सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान हा निर्णय दिला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवर राव यांना अटक केली होती. मात्र या आरोपींना अटक न करता केवळ नजनकैदेत ठेवण्याचे आदेश देत

नेमके प्रकरण काय

३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेसाठी माओवाद्यांनी पैसे पुरवल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले. यापूर्वीही एल्गार परिषदेशी संबंधित सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, महेश राऊत, रॉनी विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांनाही अटक करण्यात आली होती. याबाबत कबीर कलामंचावर देखील पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts

अमरावतीतील लव्ह जिहाद प्रकारणात आता नवा ट्वविस्ट

Aprna

गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळला!

News Desk

माया शेळके आत्महत्या प्रकरणी भिम टायगर सेना संस्थापकास अटक

News Desk