HW News Marathi
कृषी

मराठवाड्यात खरीप हंगामात ७ लाख हेक्टर क्षेत्र पेरणी विना

औरंगाबाद | पावसाच्या आगमनाबरोबर शेतकरी खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करण्यास सुरुवात करतात. परंतु गेल्या दोन महिन्यात खरीप हंगामात मराठवाड्यात ३५.२ टक्के पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांनी ४१ लाख ८० हजार ८०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. आता पेरणीचा हंगाम संपला असून आतापर्यंत ७ लाख ३० हजार ९९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली नाही. बीड जिल्ह्यात गेल्या पंधर दिवसात सर्वाधिक ९३.३५ टक्के पेरणी झाली आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्यात आतापर्यंत ३५.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वात अधिक पाऊस ४९.२ टक्के हिंगोली जिल्ह्यात पडला आहे. सर्वात कमी पाऊस हा औरंगाबाद जिल्ह्यात २५.५ टक्के पडला आहे.मराठवाड्यातील काही तालुक्यात गेल्या आठवडाभर पाऊस पडला नाही. त्यामुळे या भागातील शेकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येणार असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे. तसेच मरावाड्यात १७ लाख १७ हजार ४०० हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते. गतवर्षी बोंडअळीमुळे यंदा शेतकऱ्यांनी कपसाची लागवड केली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हुमनी’ अळीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ 

News Desk

भारतात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

News Desk

”पेसा”मुळे सौरऊर्जेने ठाणपाड्यात पाणी

News Desk