HW News Marathi
क्राइम

पैसे देण्यास नकार दिल्याने तिचे स्तनच कापले

थिरूअनंतपुरम: केरळमध्ये मंगळवारी संध्याकाळी धक्कादायक प्रकार घडला. एका ४१ वर्षांच्या महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. धक्कादायक हत्या केल्यानंतर नराधमाने त्या महिलेचे स्तन कापून नेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी थोदुपुझा येथील ३० वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे.’

सलीना असे मृत महिलेचे नाव असून ती अडिमली येथील रहिवासी अब्दुल सियादची पत्नी असल्याची माहिती मिळाली आहे. सलीना ही समुपदेशक म्हणून काम करायची. आरोपी गिरीशविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणातून सलीना आणि गिरीशची ओळख झाली होती. त्यावेळी सलीनाने त्याच्याकडून १ लाख ८ हजार रुपये घेतले होते. पण ते पैसे तिने परत केले नाहीत. तसेच गिरीशने तिच्यासाठी हप्त्यावर कारही खरेदी केली होती. पण तिने त्याचे हप्तेही वेळेवर फेडले नाहीत. गिरीशला पैशांची खूपच गरज होती. सलीनाला दिलेले पैसे घेण्यासाठी तो तिच्या घरी गेला. त्यावेळी तिने पैसे परत करण्यास नकार दिला. याच रागातून त्याने तिची हत्या केली. तसेच तिचा स्तन कापून तुकडे केले आणि बॅगमध्ये भरून तो घरी परतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लाजीरवाणी आणि संतापजनक, अजित पवार संतापले

News Desk

अभिनेता अन्नू कपूर यांची ऑनलाईन फसवणूक; ओशिवरा सायबर पथकाने Golden Hour मध्ये वसुली रक्कम

Chetan Kirdat

नांदेड जिल्ह्यात ८ एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

News Desk
मुंबई

फेरीवाल्यांना हटवा, राज यांचे आयुक्तांना निवेदन

News Desk

मुंबई: राज ठाकरे यांनी बुधवारी महापालिका आयुकत्त अजय मेहता यांची भेट घेऊन रस्त्यांवरून फेरीवाल्यांना त्वरीत हटवण्यासंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी राज यांनी रेल्वे पूल आणि फुटपाथवरून चालणा-या लोकांच्या समस्याही त्यांच्यापुढे मांडल्या. या निवेदनात राज यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदभार्तील अनेक मुद्देही उपस्थित केले आहेत.

या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा करावी. जेणेकरून तिन्ही यंत्रणांच्या समन्वयातून ठोस पावले उचलली जातील. मनसेच्या संताप मोचार्नंतर बहुतांश रेल्वे स्थानकांच्या परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यात आले आहे. मात्र, हे सगळे किती दिवस टिकेल, असा प्रश्नही लोकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लोकांना यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी पालिकेने व्हॉटसअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून द्यावेत. फेरीवाले बसतात त्या परिसरात हे व्हॉटसअ‍ॅप क्रमांक असलेले फलक पालिकेने लावावेत. जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या परिसरात फेरीवाल्यांकडून होणाºया अतिक्रमणाचे फोटो पाठवता येतील.

Related posts

हे आहेत यंदाच्या नवरात्रीचे ९ रंग

News Desk

‘जय राजस्थान’ चा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मनसे स्मरणशक्तीचे पुस्तके पाठवणार

News Desk

भांडुपमध्ये सार्वजनिक शौचालय खचले, दोन जणांचा मृत्यू

swarit