HW News Marathi
शिक्षण

प्रलंबित शिष्यवृत्तीसाठी अभाविपचं धरणे आंदोलन

मुंबई | पदवी व पदव्युत्तर प्रलंबित शिष्यवृत्ती, परीक्षेच्या वेळापत्रकात वारंवार बदलणारे नियम, ऑनलाईन प्रक्रियेमुळे प्रवेशप्रक्रियाचा होणारा गोंधळ, निकालांचा गोंधळ, यांसह इतर कारणांमुळे सध्या शिक्षण विभागाचा बोजवारा उडाला आहे. या सर्व मुद्द्यांवर आणि काही नवीन मागण्यांसाठी गुरूवारी ३० ऑगस्टला आझाद मैदानात अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं होते.

यावेळी सध्या महाराष्ट्रासह मुंबई शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सर्व रखडलेल्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना येत्या १५ दिवसात देण्यात याव्यात. तसेच या शिष्यवृत्तींची रक्कम प्रतिवर्ष २५५० ते १२००० रू इतकी करावी, असे आशिष चौहान, राष्ट्रीय महामंत्री, अभाविप यांनी एच डब्लूला सांगितले. पदवी व पदव्युत्तर शिष्यवृत्ती व फेलोशिप १५ दिवसांच्या आत देण्यात यावी, २००३ नंतर शिष्यवृत्तीत वाढ झाली होती मात्र आतापर्यंत यावर कोणत्याही प्रकारचं लक्ष केंद्रीत केल नसून त्यात लवकरात लवकर वाढ करण्याची मागणी अभाविपनं केंद्रसरकारकडे केली आहे.

तसेच अनुसुचित जाती-जमाती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्ती प्रत्येक महिन्याला वेळेत दिल्या जाव्यात. तसेच विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी वसतीगृह उपलब्ध करावीत, तसेच त्या प्रत्येक वसतीगृहात गार्डन, स्वयंपाकी, सुरक्षारक्षक उपलब्ध करून द्याव्यात. यांसारख्या इतर मागण्या गुरूवारी धरणे आंदोलनाद्वारे सरकारकडे करण्यात आल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलवर डॉ.अजित गोपछडे यांची नियुक्ती

News Desk

बारावीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

News Desk

ग्रामीण भागातही एनसीसीची विस्तार-सुभाष भामरे

News Desk
महाराष्ट्र

सचिन अंदुरेच्या सीबीआय कोठडीत दोन दिवसांची वाढ

News Desk

पुणे | डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सचिन अंदुरेच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची एकत्रित चौकशी करायची असल्याने सीबीआय कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली. अखेर न्यायालयाने ही मागणी मान्य करत सचिन अंदुरेची कोठडी १ सप्टेंबरपर्यंत वाढवली.

दुसरीकडे शरद कळसकरचा ताबा ३ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र एटीएसकडे आहे. त्याचा ताबा सीबीआयकडे देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने, आता सीबीआय सचिन अंदुरेला घेऊन मुंबईला महाराष्ट्र एटीएएसच्या कोठडीत असलेल्या कळसकरकडे जाणार आहे. तिथे दोघांना एकमेकांसमोर बसवून चौकशी करण्यात येणार आहे.

गुरुवारी अंदुरेला सीबीआयने पुणे न्यायालयात हजर केले. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची एकत्रित चौकशी करणे गरजेचे असल्याने कोठडी वाढवून देण्याची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद सीबीआयच्या वतीने करण्यात आला. अखेर न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सचिन अंदुरेच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. सचिन अंदुरेला १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवले जाणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज करण्यात आला आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेच्या संपर्कात होते. त्याचप्रमाणे सचिनच्या मेहुण्याकडे सापडलेल्या पिस्तुलातूनच लंकेश यांची हत्या केल्याचे समोर आले आहे, अशी माहितीही सीबीआयने न्यायालयात दिली. त्यामुळे सचिन अंदुरेची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, असा युक्तिवाद सीबीआयच्या वतीने करण्यात आला आहे.

Related posts

सरन्यायाधीश उदय लळीत न्याय क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरतील

Aprna

शिवसेनेच्या गळतीच्या प्रमाणात वाढ

News Desk

संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा साबळे वाघिरे कंपनीचा निर्णय

News Desk