HW News Marathi
मनोरंजन

बीग बीसोबत नागराजचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई(वृत्तसंस्था): महानायक बिग बी अमिताभ बच्चन सैराट फेम नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटात काम करणार आहेत. नागराजने फेसबूकवर यासंबंधी खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून बी बी नागराजसोबत काम करणार असल्याची चर्चा होती, त्यावर नागराजने स्पष्टीकरण दिले आहे. ज्याला पाहत मी लहानाचा मोठा झालो, ते बी बी माझ्या आगामी चित्रपटात नायकाची भूमिका साकारणार आहेत, असे नागराजने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे नागराजने ही पोस्ट हिंदीमध्ये पोस्ट केली आहे. त्यात त्याने हा चित्रपट हिंदी असल्याचेही स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शाहरुखचा झिरो मोठ्या साईजमध्ये रिलीज

News Desk

‘एप्रिल फूल’ 1 एप्रिललाच का बनवले जाते?

News Desk

Kargil Vijay Diwas : जाणून घ्या…पाकिस्तानचे कंबरडे मोडणाऱ्या मिग-२९ बद्दल

News Desk
देश / विदेश

नागरिकतेवर प्रश्न उपस्थित करणे यासारखे दुर्दैव नाही – हमीद अन्सारी

News Desk

नवी दिल्ली – जमावांकडून एखाद्या निष्पाप व्यक्तीची निर्घृणपणे करण्यात येणारी हत्या, ‘घरवापसी’, यांसारख्या घटना घडत असतील, तर ही भारतीय मूल्य कमकुवत होत असल्याची लक्षणे आहेत. तुमच्या भारतीय नागरिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे, यासारखी दुसरी दुर्दैवी घटना नाही, अशा शब्दांत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

सलग दुसऱ्यांदा उपराष्ट्रपतिपद भूषवलेल्या अन्सारी यांचा कार्यकाळ आज गुरुवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा टीव्हीने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य केले.

‘देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना आहे. मुस्लिम समाजाकडे संशयाने पाहिले जाते. देशातील वेगवेगळ्या भागात मी गेलो, त्यावेळी मला असेच संशयाचे बोल ऐकायला मिळाले. बेंगळुरूला गेलो तेव्हाही मी हेच ऐकले आणि उत्तर भारतातून तर मोठ्या प्रमाणात असेचऐकायला मिळते,’ असेही अन्सारी म्हणाले. देशभर सुरू असलेल्या तीन तलाकवर बोलताना अन्सारी म्हणाले की, तीन तलाकच्या अनुचित प्रथेबद्दल दुमत होऊ शकत नाही. मात्र न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये, कारण कोणताही बदल समाजामधूनच होत असतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Related posts

मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप, ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

swarit

राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही !

swarit

भाजप सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत, सामनातून भाजपवर टीका

News Desk