HW News Marathi
मनोरंजन

९९व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी

मुंबई | ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले आहेत. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार ह्यांच्याकडून ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. नाट्य संमेलनाचे ठिकाण लवकरच जाहीर होणार असून, नागपूर, लातूर , पिंपरी चिंचवड या ठिकाणांची नावे स्पर्धेत आहेत. नाट्य संमेलन समिती या ठिकाणांचा दौरा करून संमेलनाचे अंतिम ठिकाण लवकरच ठरवणार आहे. श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर अशी नावे स्पर्धेत होती. परंतु प्रेमानंद गज्वी यांच्या नावावर एकमतानं शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बीग बी अमिताभ यांच्याकडून मुंबई स्पीरिटचे कौतुक

News Desk

‘नशीबवान’  भाऊंचा ब्लडी फुल परफॉर्मन्स

News Desk

पारंपरिक तिळाच्या वड्या

News Desk
राजकारण

कॉंग्रेसचे माजी मंत्री सीपी जोशींनी केली पंतप्रधान मोदींवर जातीय टिका

News Desk

नवी दिल्ली | राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे. अशातच पक्षांच्या नेत्यांच्या प्रचार सभांचा जोरही वाढू लागला आहे. नाथद्वारा मतदारसंघात प्रचार करताना एका सभेत कॉंग्रसचे नेते सीपी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, साध्वी प्रज्ञा, साध्वी ऋतंबरा, उमा भारती यांच्यावर जातीय टीका केली आहे. त्यामुळे भजप नेत्यांना आयता मुद्दाच हाती मिळाला आहे.

कॉंग्रेसचे माजी मंत्री सीपी जोशी नाथद्वारमध्ये प्रचार करीत आहे. त्यावेळी त्यांनी उमा भारतींची जात लोधी आहे. ऋतंबरा, साध्वी प्रज्ञा याही सवर्ण नाहीत. मोदींची जात तरी काय आहे ? आणि हे सगळे हिंदुधर्माबद्दल बोलत आहेत. या देशात फक्त ब्राह्मण आहेत जे हिंदू धर्माबद्दल बोलत नाहीत म्हणूनच या देशाची दिशाभूल होते आहे. धर्म आणि राजकारण दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ५० वर्षांत यांना शिंग फुटली आहेत, अशी टीका केली. नंतर ट्विटरवरुन याबद्दल दुःखही व्यक्त केले आहे.

राजस्थानमध्ये ७ डिसेंबरला मतदान आहे. तेव्हा कुठलाही धोका न पत्करता राहुल गांधींनी सावधगिरी बाळगत लगेच जोशींच्या विधानावर ट्विटवरून नाराजी व्यक्त करुन आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. जोशींच्या विधानानंतर भाजपने काँग्रेसवर जातीय विद्वेषाचे राजकारण करण्याची टीका करत हा मुद्दा उचलून धरला आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

निवडणुका जवळ आल्यानं राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून भाजपा जनतेला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. हा विषय अजून सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यांचा निकाल आला की काँग्रेसच अयोध्येत राम मंदिर उभारेल, अशी घोषणा सी. पी. जोशी यांनी सभेत केली होती.

Related posts

लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात ६०.२१ टक्के मतदान

News Desk

#LokSabhaElections2019 : खोतकरांची माघार, जालन्यातून दानवेंनाच मिळणार उमेदवारी ?

News Desk

मुख्यमंत्र्यांनी घेतली गजानन कीर्तिकर यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna