HW News Marathi
मनोरंजन

नाना पाटेकरांनी का दिली पत्रकारांच्या प्रश्नांना बगल ?

मुंबई | तनुश्री दत्ताने केलेल्या गंभीर आरोपांसंदर्भात नाना पाटेकर हे आज (8 आॅक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार होते. तनुश्री दत्ताला नाना पाटेकर यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे जोपर्यंत ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत नाना पाटेकर माध्यमांशी संवाद साधणार नाही असे सांगत ही पूर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती. तरीही आज दुपारी नाना पाटेकर हे अवघ्या काही मिनिटांसाठी माध्यमांसमोर आले होते. परंतु यावेळीही नाना पाटेकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. यावेळी नाना पाटेकर पत्रकारांच्या प्रश्नांना बगल देत तिथून निघून गेले.

‘हॉर्न ओके प्लिज’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केला आहे. तनुश्री दत्ताने केलेल्या गंभीर आरोपांवर काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर म्हणाले होते कि, “जे खोटे आहे ते खोटेच आहे.” परंतु यासंदर्भात नाना पाटेकर यांनी मात्र कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया अद्यापही दिलेली नाही. दुसरीकडे नाना पाटेकर यांनी आपल्याला कोणतीही नोटीस पाठवली नसल्याचा दावा तनुश्री दत्ताकडून केला जात आहे. तसेच नोटीस नाही पण धमक्या मात्र मिळत आहेत असा आरोपही तनुश्रीने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एस. के. राय कनिष्ठ महाविद्यालयाने राबवली स्वच्छता मोहीम

Gauri Tilekar

‘नाशिकचा मी आशिक’ चा टिझर लॉन्च

News Desk

लवकरच रीगल सिनेमागृह बंद होणार

swarit
शिक्षण

बी.फार्म करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका तत्वावर मेडिकल दुकानात काम करता येणार

News Desk

मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांची घोषणा

मुंबई : मेडिकल स्टोर मध्ये फार्मासिस्ट मिळत नसल्यामुळे यापुढे बी. फार्म करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका या तत्वावर काम करण्याची परवानगी देण्यात येईल अशी महत्त्वाची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या प्रश्नावर आज विधानसभेत केली.

राज्यातील औषधांच्या दुकानांमध्ये फार्मासिस्ट ठेवणे बंधनकारक असून असे फार्मासिस्ट मिळत नाहीत, त्यामुळे औषध विक्रेता दुकानदाराची गैरसोय होतेच तसेच रुग्णांचे ही नुकसान होते. त्यामुळे याबाबत सरकारने योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली. दहिसर येथील साई शिवाई फार्म मधून बनावट इनहेलर चा साठा जप्त करण्यात आला होता याबाबतचा तारांकित प्रश्न आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. यावेळी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी रुग्णांची आणि औषध विक्रेत्यांची होणारी गैरसोय याकडे सरकारचे लक्ष वेधले त्यावर उत्तर देताना मंत्री गिरीश बापट म्हणाले की, मेडिकल स्टोर मध्ये फार्मासिस्ट असणे बंधनकारक आहे. मात्र तेवढे फार्मासिस्ट उपलब्ध होत नाहीत, त्यासाठी बी.फार्म शिकणारी मुल ही शिकत असताना कमवा आणि शिका या तत्वावर मेडिकल स्टोर वर काम करू शकतील अशी परवानगी सरकार कडून देण्यात येईल जेणेकरून रुग्णांची गैरसोय होणार नाही आणि तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

Related posts

१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्रालयाचा अजब आदेश

News Desk

तुमच्या पगारापेक्षा बाराशेपट अधिक पगार घेतात सीईओ

News Desk

स्कूलबस चालकाचा मुलगा सीएसच्या परीक्षेत अव्वल

News Desk