HW News Marathi
महाराष्ट्र

नवी मुंबईत आधार कार्डसाठी मध्यरात्रीपासून रांगा

नवी मुंबई खारघर,वाशी परिसरात मध्यरात्रीपासून आधारकार्डसाठी रांगा लागल्या आहेत.आधार कार्ड काढण्यासाठी लोकांनी सिंडिकेट बँकेसमोर मोठी गर्दी केली आहे. सकाळी १० वाजता बॅंक उघडते मात्र लोकांनी रात्री पासून रांगा लावले आहेत.

लोकांनी रात्रीपासून आधारकार्डसाठी रांगा लावले आहेत मात्र बॅंक एका दिवसाला फक्त तीस आधआर कार्ड देत असल्याने लोकांमध्ये संताप आहे. आधार कार्डचा गैरव्यवहार टाळण्यासाठी सध्या बॅक आणि पोस्ट ऑफीसमध्ये आधारकार्ड मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जाणून घ्या १० वी-१२ वीचा निकाल कधी जाहीर होणार

News Desk

‘तुम्ही सगळे महाराज एकत्र या, मग होऊन जाऊद्या आमने-सामने’, शिवसेना आमदाराचे वक्तव्य

News Desk

शरद पवारांचे निकटवर्तीय अॅड एकनाथराव साळवे यांचं निधन

News Desk
महाराष्ट्र

फळभाज्यांचे भाव गगनाला

News Desk

नाशिक : काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आवक घटली आहे. त्याच वेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून गुजरातमध्ये मोठया प्रमाणात फळभाज्यांची निर्यात होत असल्याने बाजारभाव तेजीत आहेत. परिणामत; किरकोळ बाजारात फळभाज्यांचे दर गगनाला भिडले असून सर्वसामान्य ग्राहक चिंतेत आहे.

नाशिक बाजारसमितीतून गुजरात राज्यात शेतमालाला मागणी वाढलेली असल्याने बाजारभावात तेजी निर्माण झालेली आहे. ढोबळी मिरची ३० रूपये प्रति किलो, लामडी वांगी ५० रूपये, दोडका ४० रूपये, भोपळा ३० रूपये नग, हिरवे वांगी ३५ रूपये, लाल वांगी ४० रूपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत असल्याचे भाजीपाला व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले.

पावसाने सध्या उघडीप दिलेली असली, तरी नवीन फळभाज्या दाखल झाल्या नसल्याने बाजारभाव तेजीत आहे. मात्र आगामी काही दिवसात सर्वच फळभाज्या मोठया प्रमाणात दाखल होण्याची शक्यता असल्याने बाजारभाव घसरण्याची शक्यता असल्याचे बाजारसमिती सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत किमान ४० रुपये प्रतिकिलो बाजारभाव असलेल्या फळभाज्या किरकोळ बाजारात व हातगाडीवर ग्राहकांना ७० ते ८०रुपये प्रतिकिलो दराने खरेदी कराव्या लागत आहेत

Related posts

आज बारावीचा निकाल जाहीर होणार; ‘या’ वेबसाईटवर निकाल पाहण्याची सोय

Aprna

तुमच्यात हिंमत नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो, फडणवीसांनी सरकारला सुनावलं!

News Desk

काँग्रेसचा आज हाथरस घटनेच्या निषेधार्थ सत्याग्रह!

News Desk