HW News Marathi
महाराष्ट्र

ओबीसी परिषदेसाठी काँग्रेसचे नाना पटोले जाणार पवारांच्या बारामतीत!

मुंबई। पुण्यातील ओबीसी समाजातील काही लोक मला भेटायला आले होते. ओबीसी आरक्षणाबाबत ओबीसी समाजातील लोकांच्या भावना प्रचंड तीव्र आहेत. बारामती केंद्रस्थानी असल्यामुळे त्यांनी बारामतीत ओबीसी आरक्षणासाठी परिषद घेण्याची आता मागणी केली, या मागणीनंतर मी २९ जुलै रोजी ओबीसी आरक्षणासंबंधी होणाऱ्या परिषदेला जाणार असल्याची माहिती यावेळी नाना पटोले यांनी दिली . ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आज (१५जुलै) नाना पटोले यांच्या नेतृत्त्वात हँगिंग गार्डन राजभवनापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली.

त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय, बारामती केंद्रस्थानी असल्यामुळे त्यांनी बारामतीत ओबीसी आरक्षणासाठी परिषद घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे यात कोणीही चुकीचा अर्थ घेऊ नये, ही परिषद केंद्रसरकारविरुद्ध असेल, असेही त्यांनी म्हटले आहे . तसेच , महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणाची काळजी आहे . राजकारणापलिकडे जाऊन हे आरक्षण मिळवायचं आहे. त्यासाठी केंद्रसरकारकडून इम्पेरिकल डेटा मिळवण्यासाठी भाजप नेत्यांची मदत होईल. भुजबळ साहेबांच्या वतीने आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली असल्याचे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले आहे.

नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष चालणार, असं देखील नमूद केलं. शरद पवार हे आमचे नेते आहेत , ते राज्याचे नेते आहेत. पवार साहेबांच्या मार्गदर्शनात सरकार चालू आहे आणि त्यांच्या हातात रिमोट कंट्रोल आहे. भाजपनेते राज्यात अस्थिरता निर्माण करण्यासाठी काहीही म्हणत असतात आणि विधानसभेत ते गोंधळ घालत असतात. तर राष्ट्रपती राजवट लागू करू अश्या धमक्या देतात, असे म्हणत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला चांगलंच प्रत्युत्तर दिले आहे.

नाना पटोलेंची सायकल रॅली –

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात इंधन दरवाढीविरोधात मुंबईत सायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर नाना पटोलेंच्या नेतृत्तावत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना महागाईबाबत निवेदन दिलं आहे. यामध्ये महागाई कशी वाढली, किती टक्क्यांनी वाढली, याची सविस्तर माहिती काँग्रेसने राज्यपालांना देण्यात आली आहे. तसंच या निवेदनात महागाई , इंधनवाढ सोबत मराठा आरक्षण , ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डेटा , लसींचा पुरवठा यासंदर्भात देखील राज्यपालांना माहिती देण्यात आली आहे. तातडीने महागाई कमी करावी, ओबीसीचा डेटा त्वरीत द्यावा, मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा, लस तातडीने उपल्बध करुन द्यावी आणि कृषी कायदे रद्द करावेत , अशी मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे केली आहे. केंद्र सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर काँग्रेस हे आंदोलन आणखी तीव्र करेल असा इशारा पटोलेंनी यावेळी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार?”- अजित पवार

News Desk

कोल्हापुरात पूर, मुंबई चिंब

News Desk

एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन!

News Desk