HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूर आणि सांगली महापूरात आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू

पुणे। महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ४३जणांचा मृत्यू झाला असून फक्त सांगली जिल्ह्यात २१ बळी आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील सात जणांचा नागरिकांचा समावेश आहे. याचबरोबर सातारा आणि पुणे जिल्ह्यातही प्रत्येकी सात जणांचा समावेश आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी आज सोमवारी (१२ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत दिली

म्हैसकर म्हणाले, की पुणे विभागामध्ये पडलेला पाऊस रेकॉर्डब्रेक आहे. यामध्ये अनेक प्रकारची हानी झाली आहे रविवारी (११ ऑगस्ट) दोन मृतदेह सांगली जिल्ह्यामध्ये सापडले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही तर तीन जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्या व्यक्तींमध्ये एक व्यक्ती सांगली तर एक व्यक्ती कोल्हापूर आणि एक व्यक्ती सातारचे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचा पुरोगामीपणाचा बुरखा फाडला गेला, पडळकरांची जहरी टीका

News Desk

विधानपरिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

swarit

पांडुरंगाच्या ” रिंगण ” सोहळ्यासाठी एस.टी.च्या जादा बसेस

News Desk