HW News Marathi
देश / विदेश

मेट्रो कारशेडचे काम थांबणार नाही, ती जागा राज्य सरकारचीच – आदित्य ठाकरे

मुंबई | मेट्रो कारशेडवरून एक नवा वाद सुरु झाला आहे. केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा हा संघर्ष पेटला आहे. ठाकरे सरकारने आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एमएमआरडीएनं कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात केली. मात्र आता केंद्रानं कांजूरमार्गमधील जागेवर केंद्राचा दावा सांगितला आहे. तसे, पत्रही केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागानं (डीपीआयआयटी) राज्य सरकारला पाठवले आहे.

यावरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रानं कांजूरमार्गमधील १०२ एकर जागेवर दावा सांगितला असताना राज्य सरकारनंदेखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. कांजूरमार्गमध्ये सुरू असलेलं काम थांबणार नाही, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी ‘मुंबई मिरर’ला दिली आहे. ‘केंद्राकडून राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पाठवण्यात आलेल्या पत्राची मला कल्पना आहे. पण ती जागा केंद्राच्या मालकीची नाही, तर राज्य सरकारच्या मालकीची आहे,’ असं ठाकरेंनी सांगितलं. पण यावर अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

काय लिहिले आहे पत्रात?

कांजूरमार्गमधील १०२ एकरवर मेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू झाले आहे. यावरून डीपीआयआयटीनं राज्य सरकारला पत्र पाठवून बांधकाम थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुजरात केडरचे अधिकारी असलेले गुरुप्रसाद मोहापात्रा डीपीआयआयटी विभागाचे प्रमुख आहेत. ‘जिल्हाधिकारी, एमएसडी आणि एमएमआरडीए यांनी केलेल्या कार्यवाहीमुळे डीपीआयआयटीचं मोठं नुकसान झालं आहे. भारत सरकारच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात दिलेले आदेश रद्द करावेत, अशी मी विनंती करतो,’ असे या पत्रात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राज्यपाल भाजपा सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे’, संजय राऊतांचा गंभीर आरोप

News Desk

नक्षलवाद्यांना विकास नकोय – गृहमंत्री राजनाथ सिंह

News Desk

शरद पवार आणि संजय राऊत दिल्लीला रवाना

News Desk