HW News Marathi
महाराष्ट्र

“महाराष्ट्राची अवस्था आई नीट जेवू देईन अन् बाप भीक मागू देईना”, अशी झाली आहे, महापौरांनी केंद्राला सुनावले

मुंबई | मुंबई मेट्रोच्या कामासाठी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. आता यावरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे. मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. जर ती केंद्राची जागा आहे, तर ती जागा महाराष्ट्राच्या कामासाठी मागत आहोत. मात्र आई नीट जेवू देईना अन् बाप भीक मागू देईना, अशी महाराष्ट्राची अवस्था करण्याचं षडयंत्र हे रचलं जात आहे, असा आरोप मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

“मेट्रो कारशेडच्या मुद्यावरुन जगाला किती खालच्या पातळीवर राजकारण सुरु आहे हे दिसतं आहे. जर ती केंद्राची जागा आहे, तर ती जागा महाराष्ट्राच्या कामासाठी मागत आहोत. अशा अनेक जागा आहेत, त्या केंद्राने दिल्या असतील. पण कुरघोड्या करणं असे काही होत आहे. तर मराठीतील म्हणीप्रमाणे आई नीट जेवू देईना अन् बाप भीक मागू देईना अशी महाराष्ट्राची अवस्था करण्याचं षडयंत्र हे रचलं जात आहे,” असे किशोरी पेडणेकर यांनी म्हणत केंद्राला सुनावले आहे.

“पण महाराष्ट्राला कोंडीत पकडायचं आहे तर असे निर्णय होत राहणार. पण आमचं मंत्रिमंडळ सक्षम आहे. यावर नक्की चांगला तोडगा निघेल,” असेही महापौरांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मेट्रो कारशेडवरुन एक नवा वाद निर्माण झाला आहे.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता मेट्रोच्या कारशेडवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. नुकतंच केंद्राने याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.

“कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही. यापूर्वीही MMRDA चा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळे आमच्या परस्पर कारशेड उभारणं चुकीचं आहे. त्यामुळे MMRDA ने या कारशेडचे काम त्वरित थांबवा,” असेही केंद्राने या पत्रात लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करणाऱ्या उद्योगांना राज्य सरकार प्रोत्साहन देणारः सुभाष देसाई

swarit

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याला अटक होण्याची पहिलीच वेळ!

News Desk

मुख्यमंत्र्यांनी मी ६ जूनला भूमिका घेण्यापूर्वी समाजाचे ५ प्रश्न मार्गी लावावेत, संभाजीराजेंचा इशारा

News Desk