HW News Marathi
महाराष्ट्र

“महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची”, मेट्रो कारशेडवरुन शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबई | मुंबई मेट्रोच्या कारशेडवरुन नवा वाद सुरु झाला आहे. राज्य आणि केंद्र सरकार असा हा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्ष नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला सुनावले आहे. “मुख्यमंत्र्यांनी आरेच्या ऐवजी कांजूरमार्गला मेट्रोच कारशेड नेण्याचा निर्णय घेतला त्यावेळीच आम्ही म्हटलं होतं की राज्य सरकारचा यामागे हेतू दिसत आहे. ज्यावेळी कारशेड हलवण्याची घोषणा झाली त्यावेळेस आम्ही प्रतिक्रिया दिली होती की अहंकारी राजा आणि विलास राजपूत्र यामूळे मुंबईकरांना त्रास होत आहे. आज ज्या पद्धतीच्या गोष्टी समोर येत आहेत त्याप्रमाणे मीठावर समितीची परवानगी जागा नावावर करुन घेताना घेतली होती का?” असा प्रश्न भाजपने ठाकरे सरकारला विचारला होता.

“मात्र, आज जेव्हा केंद्राने पत्र पाठवले आहे त्यावरुन असे स्पष्ट झाले आहे की, अहंकारी प्रवृत्तीने घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांना या दुष्टपरिणामांचा सामना करावा लागत आहे. आणि मेट्रोच्या प्रकल्पामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची कार्यपद्धत आहे. त्यामुळे आधी लटकवणे आणि अडकवणे हेच सरकार करत आहे. तसेच, केंद्राच्या पत्राने हे स्पष्ट झाले आहे की, मीठागराची परवानगी सरकारने घेतली नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा लटकवणे, अडकवणे, आणि फटकवणे” असा घेतल्याचा आरोप आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री आणि ठाकरे सरकारवर केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मग कल्याण म्हणाला असता, दादा तुम्हीही पहाटे शपथविधीला होता”

News Desk

मराठा आरक्षणावरुन निलेश राणे आक्रमक  

News Desk

‘ताई, मी तुम्हाला दीर्घायुष्य चिंतितो’, फडणवीसांकडून पंकजा मुंडेंना शुभेच्छा !

News Desk