HW News Marathi
महाराष्ट्र

“आता अजित पवारांचा राजीनामा मागणार का?”, आशिष शेलारांचा सवाल

मुंबई | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपाच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा ३७३३ मतांनी पराभव केलाआहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आघाडी विरोधात भाजप अशी प्रतिष्ठेच्या झालेल्या या लढतीत भाजपाने बाजी मारली.

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस यश मिळवू शकली नाही. दरम्यान या पराभवानंतर अजित पवारांचा राजीनामा मागणार का? अशी विचारणा भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली आहे. ते मुंबईत आज (३ मे) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पश्चिम बंगालमधली पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. यासंबंधी बोलताना आशिष शेलार यांनी म्हटलं की, “अर्धवट माहितीच्या आधारावर पत्रकार परिषद घेणे म्हणजे नवाब मलिक. मोफत लस म्हणून ते तोंडावर आपटले आहेत. खोटी माहिती त्यांनी देऊ नये. तेच नवाब मलिक गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्या असे बोलत आहेत. मग पंढरपूरमध्ये त्यांच्या पक्षाला अपयश मिळाले म्हणून नवाब मलिक उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा राजिनामा मागणार का?”.

नाना पटोलेंवर शेलारांची टीका

“नाना पटोलेंचं आयुष्य कालाकांडीच्या कामात गेलं. नाना पटोले व्यवहाराच्या सत्यतेवर माहिती ठेवत नाही. उचलली जीभ, लावली टाळ्याला असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही, माहितीविना बोलणं म्हणजे कालाकांडी,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

पुनावाला प्रकरणावरुन शेलारांचा इशारा

“अदर पुनावाला प्रकरण गाजत आहे. वेगवेगळ्या पक्षांची नावं पुढे येत आहेत. पुनावाला यांना आताच सुरक्षा का मागाविशी वाटली? हा प्रश्न गंभीर आहे. त्यांचे संकेत स्थानिक पक्षाकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे. केंद्राने आपलं कामं चोख केलय. सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या सुरक्षेची गरज वाटली असेल, तर केंद्राने त्यांना सुरक्षा पुरवली आहे.

आज यावर राजकारण करायचं नाही. करोना काळात राजकारण न करता जनसेवेला प्राधान्य देण्याची भाजपाची भूमिका आहे. या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजू शेट्टींचे आज ‘चलो बारामती’ आंदोलन !

News Desk

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन असलेल्या हॉटेल व्यावसायिकाला ईडीने बजावली नोटीस

News Desk

मनसुख हिरेन प्रकरणाचा गुंता सुटला !ATS DIG शिवदीप लांडेंच्या फेसबुक पोस्टने खळबळ …

News Desk