HW News Marathi
देश / विदेश

अर्णब गोस्वामींच्या ‘त्या’ वर्तणुकीनंतर मला शरद पवारांनी फोन केला अन्…!

मुंबई | “शरद पवारांचा मला फोन आला होता कि उद्धव ठाकरेंचा उल्लेख एकेरी भाषेत होतोय. हे बरोबर नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ही फक्त एक व्यक्ती नसते संस्था असते”, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज (९ ऑगस्ट) ‘सामना’च्या रोखठोक या सदरातून सांगितले आहे. “अर्णब गोस्वामी हे ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीचे प्रमुख. ते राजकीय नेत्यांचा, मुख्यमंत्र्यांचा थेट एकेरी भाषेत उल्लेख करतात, बदनामीकारक भाषा वापरतात, धमक्या देतात. यापूर्वी सोनिया गांधींच्या बाबतीतही त्यांनी हेच केले आणि आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरीत उल्लेख करत आव्हानाची भाषा करतानाही त्यांना सर्वांनी पाहिले. हे सर्व पाहिल्यावर शरद पवारांनी मला फोन केला”, असे संजय राऊतांनी आपल्या सदरात सांगितले.

“अभिनेत्याचा खून घडवून आणला व त्यात सिनेसृष्टी व राजकीय नेत्यांचे संगनमत आहे, असे ओरडून सांगणे हा तापलेल्या तव्यावर पोळ्या भाजू इच्छिणाऱ्या गटारी पत्रांचा व वृत्तवाहिन्यांचा प्रचार साफ खोटा आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली सरकार आहे. ते कसेही करून पाडायचे. पडत नाही म्हटल्यावर बदनाम करायचे असे विरोधकांनी ठरविले व भारतीय जनता पक्षाच्या सर्वच प्रकारच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या वृत्त वाहिनीतून त्यांनी सुशांत प्रकरणात आघाडी उघडली आहे. त्या वृत्तवाहिनीच्या प्रामुख्याने केले ते गॉसिपिंग ! लोकांच्या मनातील संशय वाढवला. अर्णब गोस्वामी हे रिपब्लिक वृत्तवाहिनीचे प्रमुख”, असे म्हणत संजय राऊत यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साध्वी प्रज्ञा सिंह विरोधात एनआयए न्यायालयात याचिका दाखल

News Desk

इंधन-गॅस दरवाढीवरून सामान्य जनतेबाबतही केंद्राची जुमलेबाजी सुरू – सामना

News Desk

कोरोनाशी लढण्यासाठी राज्यांना मोदींनी दिली ‘ही’ पंचसुत्री

News Desk