HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांनी राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला !

मुंबई | “अजित पवार यांची देहबोली सुरुवातीपासूनच संशयास्पद होती. या सगळ्या घडामोडींशी शरद पवारांचा कोणताही संबंध नाही हे ठामपणे सांगू शकतो. अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला असून अजित पवारांनी राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला, असा” असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी आज (२३ नोव्हेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पवारांसह भाजपवर तोफ डागली.

राऊत पुढे म्हणाले की, भाजपने पैसा आणि सत्तेचा गैरवापर करुन सत्ता स्थापन केली. आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेतील, असे म्हणाले राऊत यांनी पत्रकार परिषदेतनंतर ट्वीट करत सांगितले की, आज १२.३० वाजता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली आहे.

राजभवनाचा सरळ सरळ अपमान केला असून रात्रीच्या अंधारात चोरुन पाप केले जाते, दरोडा टाकला जातो. दिवसाढवळ्या, लोकांना आमंत्रित करुन शपथ का घेतली नाही, याचा अर्थ तुम्ही पाप केले असा सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर निशाणा साधला. याची किंमत चुकवावी लागेल. शिवसेना खंबीर आहे. पदड्याआडून पैसा आणि सत्तेचा गैरवापर करुन, हे सगळे करण्यात आले आहे. राज्यातील जनता हे विसरणार नाही, असे राऊतांनी म्हणाले. तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतली असेही ते म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जर ती वेळ आली तर विचार करू”,मनसे सोबतच्या युतीवर फडणवीसांचं महत्त्वपूर्ण विधान..!

News Desk

Kolhapur Elections: कोल्हापुरचं मैदान कोण मारणार? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

Manasi Devkar

फोन टॅपिंगचे आदेश देणारे रश्मी शुक्लांचे ‘बिग बॉस’ कोण? – अतुल लोंढे

News Desk