HW News Marathi
महाराष्ट्र

“पटोलेंनी अधिवेशनानंतर राजीनामा दिला असता, तर अधिक बरं झालं असतं”- अजित पवार

पुणे | काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राज्यात जोरदार राजकीय हालचाली होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारनाना पटोलेंच्या या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, आता या विषयावर स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. “पटोलेंनी अधिवेशनानंतर राजीनामा दिला असता, तर अधिक बरं झालं असतं”, असं अजित पवार म्हणाले आहेत. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

“नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मी कशाला नाराज होणार. शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच हे आधी ठरलं होतं. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला ठरलं होतं. चर्चा करतात, नाना पटोलेंनी सर्वांशी चर्चा केली. आघाडी सरकारमध्ये चर्चेने मार्ग काढले जातात”, असं ते यावेळी म्हणाले आहेत. तसेच, “काँग्रेसला पदं मिळाली आहेत. त्यांनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. मात्र, अधिवेशन संपल्यावर नाना पटोलेंनी राजीनामा दिला असता तर अधिक बरं झालं असतं. पण त्यांच्या हायकमांडने निर्णय दिला”, असं त्यांनी सांगितलं आहे.

नाना पटोले यांचा राजीनामा

नाना पटोले यांनी काल (४ फेब्रुवारी) विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी आपल्या राजीनामा सुपूर्द केलाय. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपल्याला राजीनामा देण्यास सांगितल्यामुळे आपण विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे. “पाणी वाहतं राहिलं तर ते स्वच्छ असतं. यापुढे आता पक्ष जी काही जबाबदारी देईल ती जबाबदारी स्वीकारेल आणि त्या जबाबदारीला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेन. माझ्या पक्षाध्यक्षांनी जो आदेश दिला त्यानुसार मी तुमच्या सगळ्यांसमोर राजीनामा दिला. आता विधानसभेच्या अध्यक्षपदी कोण ते तीनही पक्षांचे हाय कमांड निर्णय घेईल”, असंही पटोले म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मराठा, ओबीसी, धनगर समाजाप्रति भाजपचे प्रेम पुतणा मावशीचं’, विनायक राऊतांचा भाजपला खोचक टोला!

News Desk

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गुजरातमधून सुटका, आरोपी अटक

News Desk

झोटिंग समितीच्या गहाळ अहवालावरून उपमुख्यमंत्र्यांचा सवाल

News Desk