HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांचा सरकारी विमानातून गोव्याचा प्रवास,राज्यपाल आणि ठाकरे सरकारमधील ‘तो’ वाद निवळला?

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यातील वाद सगळ्यांनाच माहित आहे. काही दिवसांपूर्वी सरकारी विमान नाकारल्यावरून राज्यपाल आणि ठाकरे सरकारमध्ये निर्माण झालेले वाद आता संपुष्टात आल्याची चिन्हं दिसत आहेत. कारण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकताच गोव्याला जाण्यासाठी सरकारी विमानाने प्रवास केला आहे. या प्रवासासाठी सरकारी विमान वापरण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली होती. त्यामुळे आता राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील संवाद पुन्हा सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तराखंडला जाण्यासाठी निघालेल्या राज्यपालांना ठाकरे सरकारने विमान नाकारले होते. त्यामुळे राज्यपालांवर सरकारी विमानातून उतरण्याची वेळ ओढावली होती. त्यानंतर महाराष्ट्रात मोठे मानपमानाचे नाट्य रंगले होते. दरम्यानच्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत आपली बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकासआघाडीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला जाणार होते. मात्र, तेव्हा राज्यपाल उत्तराखंडला निघून गेले होते.

त्यानंतर, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देऊन हा संवाद पुन्हा सुरु केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेही एक पाऊल पुढे टाकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य सरकारने राज्यपालांना विमान देऊन राज्यपालांच्या कृतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची चर्चा आहे.

मधल्या काळात हिंदुत्वावरुन मुख्यमंत्री आणि राज्यपालांचा रंगलेला वाद असो किंवा राज्यपाल नियुक्त १२ आमदारांनी रखडलेली यादी असो. इतकंच नाही तर राज्यपालांचा उत्तराखंडचा दौरा ठाकरे सरकारने विमान नाकारल्यामुळे रद्द झालेला असो, या सगळ्या उदाहरणांनरुन वारंवार राज्यपाल आणि सरकारमधील नाराजी वाढताना दिसत होती. मात्र, आता कुठेतरी या वादांना पुर्णविराम लागल्याची चिन्हे दिसत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पोलिसांसमोर हजेरी, अलिबागमध्ये बंदोबस्त वाढवला!

News Desk

महविकासआघाडीने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही !

News Desk

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार! शिक्षणमंत्र्यांची माहिती

News Desk