HW News Marathi
महाराष्ट्र

बारामतीत सर्व ४९ जागा राखण्यात राष्ट्रवादीला यश !

मुंबई । राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज (१८ जानेवारी) अवघ्या काहीच तासांत स्पष्ट होणार आहेत. राज्यातील प्रमुख नेत्यांनी यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत विशेष लक्ष दिल्याने या निवडणुका आणखी चुरशीच्या झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतून महत्त्वाची बातमी आहे. हाती आलेल्या कलांनुसार, बारामतीतील सर्वच्या सर्व ४९ जागांवर विजय मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीतील सर्व ४९ जागा राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे. तर २ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. या निकालाने संपूर्ण बारामतीत जल्लोष साजरा करण्यात येतो आहे. खरंतर, मतमोजणीला सुरवात झाल्यापासूनच इथे राष्ट्रवादीने घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली आहे. या निकालाने बारामती तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राठोड दोषी असतील तर गुन्हा दाखल होईल – गुलाबराव पाटील

News Desk

आयुष्यात माझी एकच इच्छा, पेट्रोल-डिझेल बंद करणे नितीन गडकरी

News Desk

नालासोपाऱ्यातील ‘त्या’ पॉझिटिव्ह रुग्णाने स्वत: हून महापौरांना दिली माहिती

swarit