HW News Marathi
महाराष्ट्र

…अन् अचानक अजित पवार झाले ईव्हीएमविरोधी ?

मुंबई | “महाराष्ट्राच्या निवडणुकांकडेही देशाचे वेगळे लक्ष असते. या निवडणुकांना सामोरे जात असताना लोकांच्या मनात ईव्हीएम, व्हीव्हीपॅटबाबत शंका आहे. आमचा कुणावरही अविश्वास नाही. परंतु, निवडणुका पारदर्शकच झाल्या पाहिजेत”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. ईव्हीएमविरोधात आज (८ ऑगस्ट) विरोधी पक्षाच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी अजित पवार असे म्हणाले. दरम्यान, आता जरी अजित पवार यांनी ईव्हीएमविरोधी भूमिका घेतलेली असली तरीही यापूर्वी मात्र त्यांनी “आपल्याला ईव्हीएमबाबत शंका नाही”, असे स्पष्ट विधान केले होते. मग आता अजित पवारांची भूमिका पूणर्पणे का बदलली ? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळातून उपस्थित होतो.

ईव्हीएमच्या मुद्द्यावरून शरद पवार, अजित पवार यांच्यातच मतभेद

“माझ्या मनात ईव्हीएमबाबत कोणतीही शंका नाही. ईव्हीएममध्ये जर दोष असता तर ५ राज्यांमध्ये भाजपचे सरकार गेले नसते. ईव्हीएमबाबत काहींच्या मनात अजूनही शंका आहे. मात्र, ही शंका लोकशाहीसाठी मारक आहे”, असे विधान अजित पवार यांनी १४ मे रोजी म्हणजेच लोकसभा निवडणुकांच्या निकालांपूर्वी केले होते. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १० जून रोजी मुंबईत पार परडलेल्या २० व्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या परस्परविरोधी विधान केले होते. इतकेच नव्हे तर “जिंकल्यावर ईव्हीएमवर संशय नसतो, मग पराभवानंतरच का ?” असा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केला होता.

माझ्या मनात ईव्हीएमबाबत कोणतीही शंका नाही !

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुख्यमंत्री सांत्वनासाठी दिलीप कुमारांच्या घरी गेले पण स्वप्निल लोणकरच्या आईला भेटण्यासाठी वेळ नाही”

News Desk

भाजपचे १२ निलंबित आमदार पुन्हा एकवटले, फडणवीसांच्या निवासस्थानी खलबतं सुरू

News Desk

’19 दिवसात दिले तब्बल 10 कोटी डोस’, देशात लसीकरण वेगाने!

News Desk