HW News Marathi
महाराष्ट्र

अर्णब यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये जाऊन भेटता येणार नाही, राज्यपालांच्या निर्देशांवर गृहमंत्र्यांचे उत्तर

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यावरुन भाजप आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरु आहेत. तर या वादात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही उडी घेतली आहे. “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोन आला होता. पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये जाऊन भेटू द्या, असं त्यांनी सांगितलं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील सर्व जेलमध्ये कोणत्याही कैद्याच्या नातेवाईकांना जेलमध्ये जाऊन भेटण्यास मनाई करण्यात आली आहे.

कारण संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे अर्णब यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये जाऊन भेटता येणार नाही. पण ते फोनवर अर्णव यांच्याशी बोलू शकतात”, अशी भूमिका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडली आहे“अर्णब गोस्वामी प्रकरण कोर्टात सुरु आहे. त्यामुळे यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. जो निर्णय घ्यायचा आहे तो कोर्ट घेईल”, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली “जेलमध्ये फोन वापरण्याची मुभा आहे. जेल प्रशासनाकडून त्याची परवानगी घ्यावी लागते.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्णव यांना त्यांचे नातेवाईक किंवा वकील प्रत्यक्ष भेटू शकणार नाहीत. पण फोनवर ते बोलू शकतील”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.“याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. अर्णब यांना मारहाण झाली का? याबाबत बोलता येणार नाही. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजप यात इंटरेस्ट घेते”, असा टोला अनिल देशमुख यांनी लगावला आहे.

काय होती राज्यपालांची मागणी?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करत अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी द्यावी आणि भेटू द्यावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच, अर्णब गोस्वामी यांच्या आरोग्याबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…अन् पंकजा मुंडे ऊसाच्या फडात कामगार महिलांसोबत पोटभर जेवल्या

News Desk

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या स्थापना का आणि कशी केली होती ?

News Desk

२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट! – उद्योगमंत्री उदय सामंत

Aprna