HW News Marathi
महाराष्ट्र

मविआ सरकार आल्यापासून महाराष्ट्राला पणवती, दहीहंडीवरुन मनसेचे अविनाश जाधव आक्रमक!

ठाणे। महाविकास आघाडी सरकार आल्यापासून महाराष्ट्राला पणवती लागलेली आहे. त्यामुळे आम्हाला कोणतेही कार्यक्रम साजरे करता येत नाही. दुसरीकडे आमदारांचे नातेवाईकांचे लग्न सोहळ्याचे कार्यक्रम साजरे होत आहेत. कोविड काळात सणांवर संक्रांत आणलेली आहे, ही महाराष्ट्रवर आलेली संक्रांत आहे,अशी टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे.दहीहंडी हा उत्सव कोविड काळात होणार नाही असा निर्णय घेणारे हे कोण? असा सवाल मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश आल्यास आम्ही दहीहंडी साजरी करणार आहे.

मनसेच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली

दहीहंडी समन्वय समिती बैठकीत मनसे नेते बाळा नांदगावकर यांना देखील बोलू दिले गेले नाही. जागतिक रेकॉर्ड करणाऱ्या पथकाला देखील या समन्वय समिती च्या बैठकीत आमंत्रण दिले गेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो निर्णय घेतला आहे त्या बाबत मनसेच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली.

आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ

बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे… गेल्या वर्षी पासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत… त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावं… लस घेतल्यावर देखील काही देशात लाँकडाऊन करण्यात आलंय… इस्त्रायलने तर पुन्हा मास्क घालायला सुरवात केलीय… अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे… कारण अनेकांची हातावर पोट आहेत.. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतलांय… आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पुन्हा ती काळरात्र नकोय…

एकदा हे संकट पुर्णपणे घालवूयात… आपण यंत्रणेत कुठेही ढिलाई होऊ देत नाही आहोत. नीती आयोगाने जे सांगितलंय.. ते लक्षात घेतलं पाहीजे… गेल्या दीड वर्षात आपण जी आरोग्य सेवा वाढवलीय ती इतर कोणत्याही राज्याने वाढवलेली नाहीये.आपण दुसऱ्या लाटेत डाँक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर पडलोय… आता जी विंडो आपल्याला मिळालीय… तीचा वापर आपण थोडं अर्थ चक्र सावरण्यासाठी करूयात. पुन्हा ती काळरात्र नकोय… जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपली संस्कृती परंपरा देखील काहीवेळ समजूतीने घ्याव्या लागतील. गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचे पाऊल उचलावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गेली २०-२५ वर्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीचीची पालिकेत सत्ता आहे… सुप्रिया सुळेंच्या आरोपावर महापौरांची प्रतिक्रिया!

News Desk

संजय राठोडांच्या अडचणीत वाढ!

News Desk

निवडणुका जाहीर झाल्याने ओबीसी नेते आक्रमक, छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

News Desk