HW News Marathi
देश / विदेश

घोटाळेबाज सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर जेलचे पाहुणे होणारच ! सोमय्यांचा इशारा

मुंबई। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. प्रताप सरनाईक यांनी पंतप्रधान मोदी व भाजपशी पुन्हा जुळवून घ्या अशी विनंती पत्रात केली आहे. तर एकीकडे महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेले काँग्रेस- राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, महाविकासआघाडीसाठी सर्वाधिक अडचणीच्या ठरलेल्या या प्रसंगात भाजप टीका करण्याची संधी कशी सोडेल ?

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांना जेलमध्ये जाण्याची भीती वाटत असल्याने त्यांनी हे पत्र लिहिल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. “शिवेसेनाचे आमदार प्रताप सरनाईक जेलच्या भीतीने चिंताग्रस्त दिसत आहेत आणि आता सरनाईकनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा यांच्याशी हातमिळवणी करावी अशी विनवणी केली आहे. सर्व घोटाळेबाज प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर जेलचे पाहुणे होणारच”, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

प्रताप सरनाईक यांनी १० जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहलं होतं. सरनाईक यांच्या लेटरहेडवरील १० जूनचं पत्र एका वृत्तवाहिनीनं ट्विट केलं आहे. या पत्रात त्यांनी ‘सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे, असं म्हटलं आहे. सरनाईक यांच्या ‘लेटरबॉम्ब’मुळे आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काहीच वेळात ‘फनी’ चक्रीवादळ २०० किमी प्रतितास वेगाने ओडिसा किनारपट्टीला धडकणार

News Desk

राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे लोकसभेत गदारोळ

News Desk

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना अपोलो रुग्णालयात हलविले, मल्लिका दुआ यांची माहिती

News Desk