HW News Marathi
महाराष्ट्र

Jayant Patil HW Exclusive : भाजपच्या नेते मंडळींना ‘कोरोना’पेक्षा राजकारण जास्त महत्त्वाचे वाटते !

मुंबई |” भाजपच्या नेते मंडळींना कोरोनापेक्षा राजकारण जास्त महत्त्वाचे वाटते,” असा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी खास मुलाखती बोलताना केला आहे. लॉकडाऊनच्या काळात वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला सुट्टी जाण्यास परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री यांच्यावर भाजप टीका कर आहे. यासंदर्भात बोलताना जंयत पाटील म्हणाले की, “या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि कोणत्याही नेत्यांकडून अशी कोणतीही चूक झाली नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केले.”

वाधवान प्रकरणातवर बोलताना जयंत पाटील पुढे म्हणाले की, “लढाईही कोरोनाशी आहे किमान भाजपच्या जबाबदार नेते मंडळींनी तरी त्या गोष्टी टाळल्या पाहिजे असे ते यावेळी म्हणाले. या गोष्टी ज्यांनी केल्या त्यांना त्यांची शिक्षा तर होणारच आहे. या प्रकरणाबद्दल सतत प्रसार माध्यमांमध्ये बोलणे हे कोरोनापेक्षा यांना राजकारण जास्त महत्त्वाचे वाटेत, असा त्यांचा अर्थ निघतोय,” असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, जयंत पाटील म्हणाले, राज्यातील कोणत्याही गोष्टीवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणे ही भाजप नेत्यांची सवयच असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, भाजपने नेमलेल्या विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना वाधवान कुटुंबीयाना महाबळेश्वरला परवानगी देणार पत्र दिले आली. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर त्यांनी मध्यरात्री २ वाजता अमिताभ गुप्ता यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवले असून त्यांची चौकशी देखील सुरू केली आहे. महाराष्ट्रसारख्या मोठ्या राज्यात अधिकाऱ्यांनी चूक केली तर ती चूक सरकारने केली, असे म्हणत भाजप नेते मंडळींनी पराचा कावळा केला असे ते एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले.

वाधवान कुटुंबीयांचे संबंध शरद पवार कुटुंबींशी चुकीचे

भाजप नेते मंडळीही ऐवढ्यावरच न थांबता त्यांनी वाधवान कुटुंबीयांचे संबंध शरद पवार कुटुंबींशी जोडणे गेले हे मात्र, बरोबर नाही. लढाईही कोरोनाशी आहे. किमान भाजपच्या जबाबदार नेते मंडळींनी तरी त्या गोष्टी टाळल्या पाहिजे, असे जयंत पाटील एच. डब्ल्यू. मराठीशी सांगितले. ज्या व्यक्तींनी वाधवान कुटुंबीयाना परवानगी दिली हे उघड झाले असून त्यांना त्यांची शिक्षा तर होणारच आहे. या प्रकरणाबद्दल सतत प्रसार माध्यमांमध्ये बोलणे हे कोरोनापेक्षा यांना राजकारण जास्त महत्त्वाचे वाटेत, असा त्यांचा अर्थ निघतोय, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काकडी लागवडीमुळे शेतकरी झाला कर्जबाजारी

News Desk

महाराजांमुळेच महाराष्ट्राला इतिहास, बाकी इतर प्रांतांना फक्त भुगोल! – संजय राऊत

Aprna

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास लवकर मंजुरी द्यावी; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

Aprna