HW News Marathi
महाराष्ट्र

भागवतांकडून भाजपाची पाठराखण

नागपूर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा आज समारोप समारंभ आहे. या समारंभाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची विषेश उपस्थिती असल्यामुळे या सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या कार्यक्रमात बोलताना सरकारची पाठराखन केली आहे. “सरकार बरंच काही करु शकतं, मात्र सरकार सर्व काही करु शकत नाही” असे बोलत सरकारची भागवतांनी पाठराखन केली आहे. संघ केवळ हिंदूच नाही तर सर्व समाजाला संघटित करण्याचे काम संघाकडून होते. भारतात जन्मलेला प्रत्येक जण भारताचा सुपुत्र असेही मोहन भागवत म्हणालेत.

मुखर्जींना या कार्यक्रमाचे दिलेले निमंत्रण त्यांनी का स्वीकारले यावर चर्चा करण्यात काहीही तथ्य नसल्याचे भागवत यावेळी म्हणालेत. प्रणव मुखर्जींसारख्या सदगृहस्थांना निमंत्रण दिल्यानंतर देशात सुरु असलेली चर्चा केवळ निरर्थक आहे. प्रणव मुखर्जी हे अनुभवसंपन्न, ज्ञानसमृद्ध आहेत असेही भागवत म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चीन आणि पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक करण्याची राऊतांची मागणी, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याला दिले उत्तर 

News Desk

पवारांनी राज्यातील भीषण दुष्काळावर मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

News Desk

चीनला लढा देण्यासाठी आपल्याला ताकद वाढवावी लागणार – मोहन भागवत

News Desk
राजकारण

परळीचा आमदार मीच | धनंजय मुंडे

News Desk

परळी | औष्णिक वीज निर्मितीमुळे भारताच्या नकाशावर ओळख असलेल्या परळी शहराची आता सौर ऊर्जा निर्मितीमुळे एक नवी ओळख निर्माण झाली आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे या भागाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल. तसेच या भागातील जनतेचे एम.आय.डी.सी. चे स्वप्न मीच पूर्ण करेन असा विश्वास विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवला आहे. २०१९ ला या भागाचा आमदार मीच असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

परळी तालुक्यातील मलनाथपुर येथे ५०० कोटी रूपये खर्चुन उभारण्यात आलेल्या ८० मेगावॅट खाजगी सोलार पॉवर प्रकल्पाचे उदघाटन आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाचे उदघाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते मात्र हवामान बदलामुळे त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने धनंजय मुंडे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले.

Related posts

ममता बॅनर्जी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत

News Desk

#MarathaReservation : राज्य सरकारला आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी मुदतवाढ

News Desk

युतीचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी भाजप-शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका सुरु

News Desk