HW News Marathi
महाराष्ट्र

पक्षाप्रमाणे खातेवाटप झाले, उद्या किंवा परवा जाहीर करू !

मुंबई | “पक्षाप्रमाणे खातेवापट झाले असून उद्या किंवा परवा जाहीर करू,” असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिले. महाविकासआघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला आहे. विधान भवनात आज (३० डिसेंबर) ३६ आमदारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्र्यांना गोपनियतेची शपथ दिली. अजित पवार, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, धनंजय मुंडे यांच्यासह २६ आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तर दहा आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

आज मंत्रिमंडळाच्या विस्तारालाही संजय राऊत यांच्या गैरहजेरीने राजकीय वर्तुळात चर्चेला रंगू लागल्या होत्या. राऊतांच्या गैरहजेरी मागचे कारण म्हणजे त्यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असल्याचे बोलले जाते. यावर मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, माझ्यापर्यंत कोणाची नाराजी आलेली माहिली आली नाही, असे म्हणत नाराजीच्या बातम्यावर ते म्हणाले. शपथविधीनंतर उगाच शपथविधीनंतर वाद उत्पन्न व्हायला नको, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

या मंत्रिळमंडलाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहे. जे नियमित कर्ज भरणार आणि २ लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांसाठी वेगळी योजना सुरू करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#COVID19 : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ८९१ वर, धारावीमधील रुग्णांच्या संख्येत वाढ

News Desk

राज्यपालांनी राजभवनाच्या बाहेर येत राजकारण करावे – संजय राऊत

News Desk

औरंगाबादच्या कचराकोंडीला राज्यसरकारही जबाबदार | उद्धव ठाकरे  

News Desk