HW News Marathi
महाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून तात्काळ १० हजार कोटीची मदत

मुंबई | अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ १० हजार कोटी तरतूद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आज (२ नोव्हेंबर) मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली होती.

मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने केले जातील. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. तात्काळ मदत म्हणून १० हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. प्रशासनाकडून पंचनामा न होऊ शकल्यास शेतकऱ्यांनी नुकसानीचा फोटो काढून जरी पाठवला तरी ग्राह्य धतले जाईल, असे मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत सांगितले.

विमा कंपन्यांशी संपर्काना साधून त्यांनीही मतद करावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. जवळपास ५० लाख शेतकऱ्यांनी विमा काढला आहे, त्याचे वेगळे पैसे त्यांना मिळतील. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये मंत्री, अधिकारी पाहणीदौऱ्यावर आहेत. तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेच्या वेळी मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, डॉ अनिल बोंडे, सदाभाऊ खोत, विजय शिवतारे, डॉ सुरेश खाडे, महादेव जानकर यावेळी उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोपर्डी प्रकरणातील आरोपीवर हल्लेखोरांना ५ वर्षाची सक्तमजुरी

News Desk

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती

News Desk

राज्यात नाईट कर्फ्यू लागणार? मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता, राजेश टोपेंची माहिती!

News Desk