HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात सरकार कधी स्थापन होणार !

नवी दिल्ली | राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. “राज्यात सरकार कधी स्थापन होणार याची आम्ही वाट बघत आहोत,” असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजपला केला आहे. भाजप आणि शिवसेना यांनी लवकरता लवकर राज्यात सरकार स्थापन करावे, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज (२ नोव्हेंबर) मुंबई येथे तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

अजित पवार पुढे म्हणाले की, मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी एकत्र येऊन सरकार स्थापनेबाबत अद्याप चर्चा केलेली नाही. त्यामुळे राज्याला स्थिर सरकार मिळणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने बोलविलेल्या बैठकीत राज्यातील अवकाळी पाऊस आणि राजकीय घडमोडी बाबत चर्चा होणार असल्याची चर्चा रंगल्या आहे. तर राज्यात पडलेल्या ओल्या दुष्काळाबाबतही चर्चा होणार असल्याचे सांगितल जात आहे. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, सुमित तटकरे, धनंजय मुंडे आदि नेते उपस्थित राहणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वास्तविक हा सरपंच पदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव केलाय – अण्णा हजारे  

News Desk

राष्ट्रवादीचा पुरोगामीपणाचा बुरखा फाडला गेला, पडळकरांची जहरी टीका

News Desk

महाराष्ट्राची लेक UPSC मध्ये देशात चौथ्या क्रमवार!

News Desk