HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील, दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता, त्यामुळेच मुख्यमंत्री बोलले; राष्ट्रवादीचं मोठं विधान!

मुंबई। उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना भावी सहकारी संबोधून मोठं विधान केले होते. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी सूचक विधान केलं असावं, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजप सोडून…

जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजप सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेते काही लोक येण्याची शक्यता आहे. तशी गडबड मला दोन दिवसात दिसतेय. त्यामुळे हे दोन नेते शिवसेनेत येत असावेत. शिवसेनेत आल्याशिवाय त्यांना आजी होता येणार नाही, असा चिमटा पाटील यांनी काढला.

लगेच अंदाज बांधू नका

महाविकास आघाडीत काहीही मतभेद नाहीत. हे सरकार स्थिर आहे. दोन वर्ष भाजपचे नेते असंच बोलत आहेत. त्याकडे काही लक्ष देण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.मी आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आलो किंवा एका गाडीत दिसलो त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये. राजकारण हा फार सीरीयस बिझनेस आहे. कुणी काय बोलले यावर लगेच अंदाज बांधू नये’, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते धुळ्यात बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुकाराम मुंढेचा पहिल्याच दिवशी धक्का

News Desk

मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी देत जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंचा अडवला ताफा

News Desk

किती दिवस मुस्कटदाबी आणि हुकूमशाही सहन करणार !

News Desk