HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धवजी, शरद पवार हे शिवसेना संपवायला निघाले!

सांगली | शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला होता. त्यानंतर सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेवर दबाव आणून हे निर्णय घ्यायला भाग पाडले. उद्धवजी, शरद पवार हे शिवसेना संपवायला निघाले आहेत, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यभरात भाजपच्यावतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने केली जात आहेत. सांगलीत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. संजय राठोड यांच्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होते, मग धनंजय मुंडे यांच्यामुळे होत नाही का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यावर दबाव आणत आहे. शरद पवार हे शिवसेना संपवायचे काम करत आहेत. वाझेंना निलंबित केले जाते तर शरद पवार आता अनिल देशमुख यांना का वाचवत आहेत? उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. त्यांनी योग्य निर्णय घ्यावा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत त्वरीत नोंदणी सूट मर्यादेस मुदतवाढ

Aprna

नानाच्या नाना तऱ्हा!! ‘सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन!, भाजपचा टोला

News Desk

राज्यात १ डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू, मंत्रिमंडळाचा निर्णय

News Desk