HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याच्या दृष्टीने पुढचे १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे, कोरोना ‘हे’ जागतिक संकट !

मुंबई | “राज्याच्या दृष्टीने पुढचे १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असून कोरोना हे जागतिक संकट आहे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. “राज्यात धोक्याची वेळ आलेली नाही मात्र, काळजी घेण्याची गरज आली, अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या ३९वर गेली आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्येत वाढ होत आहे. यामुळे राज्याच्या दृष्टीने पुढचे १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असून कोरोना हे जागतिक संकट आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आज (१६ मार्च) पत्रकार परिषदेत म्हणाले.

“औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगर पालिका या दोन्ही निवडणुका पुढे घेण्याची विनंती राज्य सरकार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच राज्यातील सर्व परिक्षा पुढे ढकलल्याची माहिती त्यांनी माध्यमाद्वारे केली आहे. पूर्णपणे शटडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, असे मुख्यमंत्रीनी स्पष्ट केले आहे. आणि कोणत्याही शहराला लॉकडाऊन करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.”

मुख्यमंत्री म्हणाले, “सर्व धार्मिक, स्थळांना गर्दी होऊ देऊ नका, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. ग्रामीण भागातील सर्व शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. लोकांनी अनावश्यक प्रवास करू नये, असे आवाहन मुखमंत्र्यांनी केले आहे. लोकांनी स्व:ताहून काळजी घ्या. पार्क, मॉल आणि बिच ठिकाणे जाणे टाळा, हॉटेल बंद ठेवण्यासंदर्भात अजून निर्णय घेतलेला नाही.”

 

 

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांची ‘टरबूज्या’ म्हणत उडवली टर तर गिरीश महाराजनांही रुग्णांच्या नातेवाईकांनी सुनावले बोल

News Desk

“हम करे सो कायदा”, अशीच फडणवीसांची प्रवृत्ती, खडसेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल

News Desk

तुळजापूरमधील मराठा क्रांती मोर्चा आयोजित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

News Desk