HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचा वाघिणी असा उल्लेख, निवडणूक जिंकल्याबद्दल दिल्या शुभेच्छा!

मुंबई | पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीआधी कडवी झुंज होईल अशी अपेक्षा असताना तृणमूल काँग्रेसने मात्र सहजपणे बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपा मात्र शंभरी ओलांडण्यातही यशस्वी झालेली नाही. दरम्यान पश्चिम बंगालमधील विजयानंतर देशभरातून ममता बॅनर्जी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

 

संजय राऊतांकडूनही अभिनंदन

दरम्यान, शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी देखील ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. “एका स्त्रीने जिला आम्ही बंगालची वाघीण म्हणतो. ती निवडणुकीच्या काळात जखमी झाली. व्हिलचेअर फिरत होती. मात्र तिने बंगालमध्ये एकहाती विजय प्राप्त केला. हा विजय देशाच्या राजकारणाला दिशा देणारा आहे. बंगालच्या विजयाची मशाल देशभर प्रकाश पाडेल,” असे संजय राऊत म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पंतप्रधानांना १० दिवस येऊ नका सांगितलेलं’; शरद पवारांनी सांगितला किस्सा

News Desk

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा आज घेणार राज्यपालांची भेट

News Desk

अखेर अण्णा हजारेंचे उपोषण मागे! फडणवीसांच्या मध्यस्थीने घेतला निर्णय

News Desk