HW News Marathi
महाराष्ट्र

कांदा खरेदीनंतर साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या साठवणूक क्षमतेबाबत मागणी करणारं पत्र लिहिलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा ही २५ मेट्रिक टनावरून १५०० मेट्रिक टन इतकी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

केंद्र शासनाने २९ ऑक्टोबरच्या सुचनेप्रमाणे एपीएमसीतील कांदा खरेदीच्या दिनांकापासून पॅकेजिंगसाठी ३ दिवसांचा कालावधी दिला आहे. हा कालावधीही खुप कमी असून तो सात दिवसांचा करण्यात यावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केली आहे.

केंद्र शासनाने २३ऑक्टोबरला जीवनावश्यक वस्तु कायद्यातील नियंत्रण आदेशात सुधारणा करून घाऊक कांदा व्यापाऱ्यांसाठी २५ मे. टन तर किरकोळ कांदा व्यापाऱ्यांसाठी फक्त २ मे. टनापर्यंत साठवणुकीचे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापारी दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हाथरस प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे द्या, शिवसेनेची मागणी

News Desk

पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी खारघरमधील खड्डे प्रशासनाने भरले

News Desk

“…तोपर्यंत आम्ही विश्वास कसा ठेवणार?”; ST बाबत चर्चेच्या निमंत्रणानंतर पडळकरांचा सवाल

News Desk