HW News Marathi
Covid-19

२१ मेपर्यंत भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार?

मुंबई | जगात थैमान घातलेल्या कोरोनाची साथ कधी संपणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. आज (२७ एप्रिल) पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ३ मेला लॉकाडाऊन संपणार का हा प्रश्नही पडला आहे. अशातच, आता सिंगापूरमधील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड डिझाइनने (एसयूटीडी) अनेक देशामध्ये करोनाचा साथ संपुष्टात येईल असं म्हटले आहे. विशेष म्हणजे करोना साथा संपुष्टात येणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश असेल असाही दावा विद्यापीठाने केला आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सवर (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित माहितीचा अभ्यास केल्यानंतर हा दावा करण्यात आला आहे.

तसेच, २१ मे पर्यंत भारतातील करोनाची साथ ९७ टक्क्यांपर्यंत संपुष्टात आली असेल, असा अंदाज एसयूडीटीने मॅथमॅटीकल मॉडलिंगच्या आधारे व्यक्त केला आहे. विद्यापीठाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार संसर्ग झालेल्या भागांची संवेदनक्षमता, संसर्ग झालेल्यांची आकडेवारी, बरे झालेल्यांची आकडेवारी या सर्वांच्या आधारे आकडेमोड करुन अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारताबरोबर जगभरातील इतर देशांमधील करोनासंदर्भातील माहितीचाही अभ्यास करण्यात आला असून या माध्यमातून जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील करोना संसर्गासंदर्भातील महत्वाच्या तारखांचा अंदाज विद्यापीठाने व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांची कोरोनावर यशस्वी मात !

News Desk

राज्यात आज ८२४० नवे रुग्ण आढळेल, तर ५४६० रुग्ण झाले कोरोनामुक्त

News Desk

पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर…!; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश

News Desk