HW News Marathi
महाराष्ट्र

आरक्षणासाठी धनगर समाजही रस्त्यावर उतरणार 

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मागणीनं जोर धरलेला असतानाच आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजही पुन्हा एकदा रस्त्यावर उरण्याच्या तयारीत आहे. आरक्षणाच्या बाबतीत या सरकारनं धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप धनगर समाजातर्फे करण्यात आलाय. धनगर आरक्षणासाठीच्या आंदोलनाला येत्या १ ऑगस्ट पासून सुरुवात होणार असून, एक महिन्याच्या आत यावर निर्णय न झाल्यास होणाऱ्या परिणामांना सामोरं जाण्याची तयारी सरकारनं ठेवावी असा इशारा धनगर समाजातर्फे देण्यात आलाय. विशेष म्हणजे समाजातील भाजपच्या नेत्यांनीच आता सरकारविरोधात लढा पुकारलाय.
पुण्यात धनगर समाजाची बैठक
धनगर आरक्षणासाठी बारामती येथे झालेल्या आंदोलनादरम्यान भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताच पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु भाजप सत्तेत येऊन चार वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही अद्यापही या समाजाला आरक्षण मिळाले नाही. सरकारच्या या नाकर्तेपणामुळे धनगर समाजामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आजपासून राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती धनगर समाजाच्या नेत्यांच्या बैठकीत देण्यात आली. पुण्यातील घोले रोडवरील जवाहरलाल नेहरू सभागृहात धनगर समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीसाठी माजी आमदार प्रकाश शेडगे, जेष्ठ नेते अण्णा डांगे, आ. रामहरी रूपनवर, आ. राम वडकूते, आ. दत्तामामा भरणे, पुणे जिल्हापरिषद अध्यक्ष विश्वास देवकते यांच्यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. राज्यकर्त्यांनी धनगर समाजाचा उल्लेख धनगड केल्यामुळे संपूर्ण समाज उध्वस्त झाला आहे. धनगर आणि धनगड एकच असल्याचे अनेक पुरावे वेळोवेळी सादर करण्यात आले आहेत. परंतु राज्य सरकार अद्यापही हे मानायला तयार नाही. राज्य सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लगेच सोडवू शकते, पण ते वेळकाढूपणा करत आहेत. या समाजाचा आता सरकारवर विश्वास राहिला नाही. आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपाचे असेल. आणि याला पूर्णतः सरकार जबाबदार असेल. असा इशारा या बैठकीवेळी देण्यात आला.

Related posts

पूजा चव्हाण प्रकरणात उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया! दोषींवर कारवाई होणार…

News Desk

मानोरा व कळमना येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रांचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते लोकार्पण

Manasi Devkar

अनिल देशमुख म्हणतात, “दूध का दूध आणि पाणी का पाणी करावे!”

News Desk
कृषी

मराठवाड्यात खरीप हंगामात ७ लाख हेक्टर क्षेत्र पेरणी विना

swarit

औरंगाबाद | पावसाच्या आगमनाबरोबर शेतकरी खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करण्यास सुरुवात करतात. परंतु गेल्या दोन महिन्यात खरीप हंगामात मराठवाड्यात ३५.२ टक्के पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांनी ४१ लाख ८० हजार ८०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. आता पेरणीचा हंगाम संपला असून आतापर्यंत ७ लाख ३० हजार ९९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली नाही. बीड जिल्ह्यात गेल्या पंधर दिवसात सर्वाधिक ९३.३५ टक्के पेरणी झाली आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्यात आतापर्यंत ३५.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वात अधिक पाऊस ४९.२ टक्के हिंगोली जिल्ह्यात पडला आहे. सर्वात कमी पाऊस हा औरंगाबाद जिल्ह्यात २५.५ टक्के पडला आहे.मराठवाड्यातील काही तालुक्यात गेल्या आठवडाभर पाऊस पडला नाही. त्यामुळे या भागातील शेकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येणार असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे. तसेच मरावाड्यात १७ लाख १७ हजार ४०० हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते. गतवर्षी बोंडअळीमुळे यंदा शेतकऱ्यांनी कपसाची लागवड केली नाही.

Related posts

राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळले

News Desk

शेतकऱ्यांनी शेतीविषयक अभ्यास विदेश दौ-यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करा

News Desk

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 16 जुलैपासून दूध संकलन बंद

News Desk