HW News Marathi
देश / विदेश

महाविकासआघाडीतील नाराज काँग्रेस नेते लवकरच सोनिया गांधींची भेट घेणार

मुंबई | राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारमध्ये वारंवार अंतर्गत कुरबुरी समोर येताना दिसत आहेत. महाविकासआघाडीतील काँग्रेस नेते पुन्हा एकदा नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते लवकरच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भेट घेणार आहे. या भेटीसाठी राज्यातील नेत्यांनी सोनिया गांधींची वेळ मागितल्याची माहिती मिळत आहे. ‘टीव्ही 9’ या मराठी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण काही दिवसांपूर्वी नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा अशोक चव्हाण यांच्यासह आणखी काही काँग्रेस मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचे काँग्रेस नेते सोनिया गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त करतील, अशी चर्चा आहे. एका काँग्रेस नेत्याने बाबतची माहिती दिली आहे.

अशोक चव्हाणांची तीव्र नाराजी

राज्य मंत्रिमंडळाची २३ जुलै रोजी बैठक पार पडली होती. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, तो अशोक चव्हाण यांनाच माहिती नव्हता. आपल्याला माहिती न देता, अधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव तयार करुन थेट मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जातो, हे अत्यंत असमन्वयाचे असल्याचे अशोक चव्हाण यांचे म्हणणे आहे. याबाबत अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण यांच्या नाराजीची बातमी कुणीतरी पेरली असल्याचं स्पष्टीकरण दिले होते.

महाविकासआघाडीतील काँग्रेस नेत्यांची नाराजी कायम

महाविकासाआघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांना योग्य ते महत्त्व मिळत नसल्याने ही नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी ११ जून रोजी महाराष्ट्र काँग्रेसची तातडीची बैठक झाली. दरम्यान, या बैठीकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली.“नक्कीच काही मुद्दे आहेत. काँग्रेसला सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला पाहिजे. ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू”, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या तुलनेत काँग्रेसच्या नेत्यांना तसेच मंत्र्यांना आवश्यक ते महत्त्व मिळत नसल्याने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत धुसफूस असल्याचे पाहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२६ जूनचा ‘चक्का जाम’ ताकदीनिशी यशस्वी करा ! पंकजा मुंडेंचे ऑनलाईन बैठकीत आवाहन

News Desk

प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला – पंतप्रधान

News Desk

आज पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’, भारत-चीन तणावासह कोरोना अनलॉकविषयी बोलणार?

News Desk