HW News Marathi
Covid-19

फडणवीसांना दिल्लीचीच अधिक चिंता, दिल्लीसाठी ते सर्वकाही करतात !

मुंबई | “विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील आमदारांचा फंड दिल्लीसाठी दिला. ते सर्वकाही दिल्लीतच करत आहेत. फडणवीसांना दिल्लीचीच अधिक चिंता आहे”, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना बोचरा टोला लगावला आहे. शिवसेना नेते आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची अनलॉक मुलाखत घेतली आहे. याच मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. “मुख्यमंत्र्यांनी ‘मातोश्री’मधून बाहेर पडावे”, या विरोधकांच्या टीकेलाही मुख्यमंत्री प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस काहीच दिवसांपूर्वी दिल्लीला जाऊन आले आहेत. याबाबत मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि, ” देवेंद्र फडणवीस दिल्लीत कोरोनास्थितीची पाहणी करण्यासाठी गेले असतील. फडणवीसांना दिल्लीचीच अधिक चिंता आहे. सध्या ते प्रत्येक गोष्ट दिल्लीत करतात. फडणवीसांनी महाराष्ट्रातील आमदारांचा फंड देखील दिल्लीसाठीच दिला.” कोरोना काळात महाराष्ट्र भाजपने सातत्याने राज्याच्याविरोधी आणि केंद्राच्या समर्थनार्थ भूमिका ठेवल्याने टीका झाली आहे.

“मी घराबाहेर पडत नाही असे म्हणणारे विमानापेक्षा बैलगाडीतून का जात नाहीत ? काम करण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही. मी घरात बसून राज्यसाठी निर्णय घेत आहे. उलट प्रत्यक्ष भेटीत फक्त एकाच ठिकाणी जाता. मात्र तंत्रज्ञानामुळे आता एकाचवेळी अनेक ठिकाणी जात आहे. तंत्रज्ञानाचा वापरच करायचा नसेल तर मग शोध का लावतात? कोरोनामुळे मंत्रालय बंद आहे”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीका उत्तर दिले आहे. “मातोश्रीतून बाहेर पडून मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जावे”, असे म्हणत विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महापालिका रेमडेसिव्हीर विकत घेईल, पण उपलब्ध करुन द्या’ । पुणे महापौर

News Desk

तौक्ते चक्रीवादळानंतर फडणवीसांचा ३ दिवसीय कोकण दौरा, नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार  

News Desk

“महाराष्ट्र सरकारमुळे देशाच्या कोरोनाविरोधी लढ्याला बसला फटका”, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी फटकारलं

News Desk