HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस सरकार म्हणजे ‘आभासी’ सरकार !

मुंबई | “गेल्या पाच वर्षांत या सरकारने ठोस काम केलेले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार आहे”, असा थेट आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. सोमवारपासून (१७ जून) विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होईल. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आज (१६ जून) दुपारी १ वाजता विरोधी पक्षनेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. “सरकारचे दुष्काळाकडे लक्ष नाही. आम्ही दुष्काळी भाग पिंजून काढला आहे. मात्र, राज्याचे मंत्री दुष्काळी भागात फिरकले सुद्धा नाहीत”, असेही मुंडे म्हणाले.

“दुष्काळग्रस्त भाग असताना महाराष्ट्रात शाश्वत विकास दिसला नाही. परंतु दुष्काळाने राज्य होरपळत आहे. जो विकास झाला तो आभासी विकास आहे”, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. १७ जून हा दिवस दुष्काळ दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच दिवशी या सरकारने दुष्काळाकडे लक्ष दिलेले नाही. विशेष म्हणजे त्याच दिवशी पावसाळी अधिवेशन सुरु होत असून या प्रश्नावर आपण सरकारला धारेवर धरणार असल्याचे देखील धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले आहे.

फोडाफोडीचे नवे खाते काढून गिरीष महाजन यांना त्याचे मंत्री करा !

“सामान्य जनतेच्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवला आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरले असून त्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे”, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. “प्रशासकीय आणि पोलीस बळाच्या जोरावर दबाव टाकणे आणि फोडाफोडी करण्यातच सरकारचा वेळ जात आहे. फोडाफोडीचे नवे खाते काढून गिरीष महाजन यांना त्याचे मंत्री करावे”, असा टोला देखील धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडी चौकशी संदर्भातल्या वक्तव्यावरुन किरीट सोमय्या शरद पवारांवर संतापले

News Desk

परंतु हिशोब तर द्यावाच लागणार…सोमय्यांचा राऊतांना इशारा 

News Desk

नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या जमिन व्यवहाराची चौकशी सुरु

News Desk