HW News Marathi
महाराष्ट्र

सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द, राणेंची राऊतांवर टीका

मुंबई | “राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये”, असे ट्वीट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करावी, अशी शिफारस मंत्रिमंडळाने राज्यापाल भगतसिगं कोश्यारी यांच्याकडे केली होती. मात्र, राज्यपालांनी अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. यावरून राऊतांनी राज्यापालांवर टीका केली. राऊतांच्या टीकेला भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिली आहे.

संजय राऊत यांनी काल (१९ एप्रिल) ट्वीट करत राज्यपालांवर टीका केली. यात राऊत म्हणाले, “राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!” राऊतांच्या टीकेला राणें प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे म्हणाले, “राज्यपाल आणि राजभवन यांचे अनन्य साधारण महत्व आहे. खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊतला माहित नाही काय? सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही. समझने वालों को इशारा काफी है!, राऊतांना टॅग केले आहे.”

उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्याचबरोबर घटनेच्या कलम १६४ (४) नुसार त्यांना पदावर कायम राहण्यासाठी मुख्यमंत्री झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य होणे आ‌वश्यक आहे. आणि हा सहा महिन्यांच्या कालावधीत म्हणजे २८ मे पूर्वी ठाकरे यांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य होणे बंधनकारक आहे. येत्या २४ एप्रिलला विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. कोरोनामुळे सर्व निवडणुका लांबणीवर गेल्या असून निवडणूक आयोगाने अद्याप याची तारीख जाहीर केलेली नाही.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्येस चोरांची आळंदी करणाऱ्यांना श्रीराम माफ करणार नाहीत! सामनातून टीका

Aprna

केंद्रीय पुरातत्व विभागाने महाराष्ट्राच्या स्थळांच्या देखभालीविषयी विधिमंडळात अहवाल सादर करावा – नीलम गोऱ्हे

News Desk

…तर मी मुख्यमंत्र्यांचे नागपूर घेईन !

News Desk