HW News Marathi
देश / विदेश

…तर कोरोना आणखी वाढण्याचा धोका, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | “कोरोनाग्रस्त रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची अन्य कारणे दाखवून त्यांचे पार्थिव परस्पर सोपविले जात असल्याने आणि परिणामी पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने कोरोना वाढण्याचा धोका अधिक आहे. एकट्या नायर रूग्णालयातील अशी 44 प्रकरणे आपल्याकडे आहेत”, अशी तक्रार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.”एखादा रुग्ण दाखल झाल्याबरोबर तपासणीचा नमुना घेण्यासाठीचा जो प्रोटोकॉल आहे, त्याचे तंतोतंत पालन झाले पाहिजे”, अशीही मागणी फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस या पत्रात म्हणतात की, “कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केलेल्या व मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृत्यूची अन्य कारणे देऊन मृतदेह परस्पर सोपविल्याने मृत्यूसंख्या कमी दिसून असली. तरी त्यामुळे कोरोनाचा धोका प्रचंड वाढत आहे. यासंदर्भातील एकट्या नायर हॉस्पिटलमधील ४४ प्रकरणे समोर आली आहेत. पहिला रूग्ण ४० वर्षीय आहे. ते १२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजून ४४ मिनिटांनी रुग्णालयात दाखल झाला. सायंकाळी ७.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या रेकॉर्डवर मृत्यूचे कारण ‘लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट डिस्ट्रेस सिंड्रोम इन अ कोविड सस्पेक्ट’ असे लिहिले आहे. त्यांच्यावर झालेल्या उपचारांचे कागदपत्र पाहता त्यावर ‘शिफ्ट टू आयसोलेशन वॉर्ड अँड टेक थ्रोट स्वॅब’ असे लिहिले आहे. प्रत्यक्षात मात्र तो स्वाब घेण्यात आल्याचे दिसत नाही. पेशंट मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांचा मृतदेह तसाच परस्पर देण्यात आला आहे”

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणतात, “दुसऱ्या एका ४९ वर्षीय रुग्णाला ४ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर ४ दिवसांत म्हणजेच ८ एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण १ ‘टाईप 1 लोअर रिस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन इन नोन केस ऑफ डायबेटिस आणि २ ‘कोविड सस्पेक्ट विथ अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम’ असे लिहिण्यात आले. याही रुग्णाचे केस पेपर्स पाहता आयसोलेशनमध्ये ऍडमिट करून कोविड स्वॅब घेण्याबाबत डॉक्टरांनी लिहिले आहे. मात्र या संपूर्ण ४ दिवसांतही त्यांची टेस्ट झाल्याचे व त्याचा अहवाल आल्याचे कुठेही दिसत नाही. मृत्यूनंतर याही रुग्णाचा मृतदेह अंत्यविधीसाठी सोपविण्यात आला.

अजाणतेपणामुळे संक्रमण झाले तर कोरोनाचा धोका वाढेल !

“एकट्या नायर हॉस्पिटलमधील आतापर्यंत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार ४४ रुग्ण अशाचप्रकारे स्वॅब न घेता कोरोना संशयित म्हणून त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी देण्यात आल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले आहेत. इतरही वेगवेगळ्या हॉस्पिटलमधले काही रिपोर्ट आपल्याकडे प्राप्त झाले आहेत. एकूणच या सर्व प्रकारामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या नोंदी तर कमी होतच आहेत. परंतु त्यांना नॉन-कोवीड समजल्याने त्यांच्या घरची मंडळी किंवा जवळच्या नित्य संपर्कातील अतिजोखमीच्या लक्षणे नसलेल्याव्यक्तींचे विलगीकरण आणि टेस्टिंगही होत नाही. त्यामुळे अजाणतेपणामुळे त्यांना संक्रमण झाले असल्यास ते मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका निर्माण होतो आहे. ही प्रथा तत्काळ बंद करावी”, अशी मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टोल नाक्यांवर न्यायाधीश आणि व्हीआयपींना स्वतंत्र लेन | मद्रास उच्च न्यायालय

News Desk

शंभर वर्षांनतर पूर्ण सूर्यग्रहण पाहण्याची संधी, अमेरिकेने जाहीर केली सुटी

News Desk

पार्थ पवारांची ‘ती’ भूमिका व्यक्तिगत, आमचा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास !

News Desk