HW News Marathi
Covid-19

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र सरकार ठाम, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | कोरोनामुळे देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच क्षेत्रांना फटका बसला. याचा शैक्षणिक क्षेत्रही अपवाद नाही. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांवरून गेल्या अनेक दिवसांत मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत महाविकासआघाडी सरकारची बैठक पार पडली. या बैठकीत, ‘बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रेग्युलेटरी बॉडींना कळवण्याचा निर्णय झाला आहे.’ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. यावेळी, राज्यातील महाविकासआघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने असल्याचा विश्वासही प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे आता राज्य सरकार आणि राज्यपालांचा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

“महाविकासआघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने. अंतिम वर्ष परीक्षांबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबतही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रेग्युलेटरी बॉडींना कळवण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह मी देखील विद्यार्थ्यांची बाजू अत्यंत ठामपणे मांडली आहे”, असे प्राजक्त तनपुरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. खरंतर, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या निर्णयाला आपला विरोध दर्शवला होता.

सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही !

राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला. “अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होईल”, असे राज्यपालांनी म्हटले होते. दरम्यान, या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये वाद पाहायला मिळाला. मात्र, त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत झालेल्या बैठकीत विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याचाच निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, “सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये यासाठी आपले सरकार योग्य ती खबरदारी घेत आहे”, असाही विश्वास प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिला.

संबंधित बातम्या :

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयात राज्यपाल बदल करणार ?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साठेबाजाला वाचवण्यासाठी राज्यातील भाजप जातेय याचा अर्थ काहीतरी काळंबेरं आहे,राज्यात रेमडेसिवीरचा साठा मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न- नवाब मलिक

News Desk

जगात कोरोना रुग्णांची संख्या ७३ लाखांवर पोहोचली, तर ४ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू

News Desk

मोदींच्या भेटीआधी अजित पवार, शरद पवार ठाकरेंच्या भेटीला वर्षावर !

News Desk