HW News Marathi
महाराष्ट्र

भावना गवळींकडून जीवाला धोका, शिवसेना नेत्यानेच केला गंभीर आरोप!

नागपूर। शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर ७२ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. आणि हा आरोप उघड करण्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भावना गवळींना ईडीकडून विनाकारण त्रास देण्यात येत आहे, असा आरोप करत त्यांचे समर्थन केले होते. यानंतर भाजप नेत्यांनी हल्लाबोल केला असतानाच आता शिवसेनेतील नेत्यानेच भावना गवळी यांच्याकडून जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे.

खासदारांकडून माझ्या जीवाला धोका

तर दुसरीकडे शरद पवार यांची खासदार भावना गवळी यांनी दिशाभूल केली. खासदारांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख हरीश सारडा यांनी केला आहे. शरद पवार यांची भावना गवळी यांनी भेट घेतल्यानंतर सारडा यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली.

कारखाना २५ लाख रुपयात खरेदी केला

माझ्यावर यापूर्वीही दोन वेळा हल्ले झाले. धमकी देण्यात येत आहे. पोलिसांनी सुरुवातीला संरक्षण दिले आणि नंतर काढून घेतले. पोलिस उपअधीक्षकांनी मोबाइल जप्त केला. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. गवळी यांनी वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील शंभर कोटी रुपयांचा श्री बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखाना २५ लाख रुपयात खरेदी केला. त्यांचे खासगी सचिवांच्या भावना अॅग्रो प्रॉडक्ट अॅण्ड सर्व्हिसेसच्या नावावर हा व्यवहार झाला.

पोलिसांची खासदारांना साथ लाभली

हा घोटाळा उघडकीस आणल्यापासून धमक्यांचे फोन येत आहेत. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही अद्याप कारवाई झाली नाही. पोलिसांची खासदारांना साथ लाभली आहे. त्यांच्याकडून जीवाला धोका आहे,’ असा गंभीर आरोप सारडा यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, संजय निरुपम यांचा इशारा 

News Desk

राजघराणे मराठा समाजासोबत कायमच आहे – शिवेंद्रसिंहराजे भोसले

News Desk

मुंबईत रिक्षा, टॅक्सीचे भाड ३ रुपयांनी वाढले!

News Desk