HW News Marathi
महाराष्ट्र

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘महाराष्ट्र मॉडेल’ प्रमाणे देशाला चालावं लागेल!

मुंबई | कोरोनाच्या एका मागे माग एक कोरोनाच्या लाटा येत आहे. अशा राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्रे हातात घेतली. त्यामुळेच आता मुंबईसारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रकारे कोरोनाची परिस्थिती हाताळली आहे आणि हाताळत आहेत, त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेलत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच आता दिल्ली आणि संपूर्ण देशालाही कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. आज (२८ एप्रिल) मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सेनापती सारखं काम करत आहेत

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले आहे. कोणत्याही युद्धात सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नाही. तो वॉररुममध्ये बसून विजय मिळवून देतो. उद्धव ठाकरेंनीही एकाच ठिकाणी बसून अगदी गावपातळीपर्यंत सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत की नाही, हे पाहिले. त्यामुळे राज्यातील कोरोना आटोक्यात आणण्याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे. विरोधकांनी आता टीका करणे बंद करावे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहले होते. या पत्रातील अनेक सूचना उत्तम आहेत. राज्य सरकार त्याचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

कोरोनामुळे देश २० वर्षे मागे पडला आहे

वाढत्या कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की, गेल्या ५-१० वर्षात देश किती पुढे गेला हे माहिती नाही. पण कोरोना संकटामुळे देश २० वर्षे मागे गेला आहे. देशातील अनेक यंत्रणा कोलमडून पडल्या असून आता अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

रेमडेसिवीरचा काळा बाजार सरकार करत नाही

सध्या राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शन्सचा काळाबाजार होताना दिसत आहे. हा काळाबाजार सरकार करत नाही. अहमदनगरमधील एका नेत्यानेही अशाप्रकारे इंजेक्शन्स आणली. तो विषय वेगळा आहे. तरीही रेमडेसिविर इंजेक्शन्स ही सरकारच्या माध्यमातूनच गरजू लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. भाजपचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिल्लीहून आणलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनवर राऊत यांनी भाष्य केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगली जिल्ह्यातील ऊस दर आंदोलनाला आक्रमक रूप

News Desk

मुख्यमंत्र्यांचे अपघातग्रस्त हेलीकाॅप्टर चाैकशी समितीने मध्यरात्री मुंबईकडे रवाना

News Desk

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ! रामदास आठवलेंची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मागणी

News Desk