HW News Marathi
महाराष्ट्र

….हे तर देसाईंचे मत | मुख्यमंत्री

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या नाणार दौ-यावर आहेत. त्यामुळे साहजिकच तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत ते नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. नाणारमध्ये होत असलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. हे लक्षात घेता नाणारमध्ये सोमवारी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली यावेळी सभेत बोलताना उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करत असल्याची घोषणा केली.

सुभाष देसाईंनी जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द झाल्याचे घोषित करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अशी नाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द झाली नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. त्याचबरोबर अधिसूचना रद्द हे सुभाष देसाई यांचे वैयक्तिक मत आहे. परंतु या प्रकल्पासंदर्भात सचिवांची समिती (हाय पॉवर कमिटी) जो निर्णय घेईल तो निर्णय अंतिम असेल. तसेच आध्यदेश रद्द करण्याचे अधिकार मंत्र्यांना नाहीत. कोकण आणि महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बिहारमध्ये दुसऱ्याची बायको पळवली, महाराष्ट्रातही गुपचूप लग्न केलं होतं पण…!

News Desk

…अन् अचानक अजित पवार झाले ईव्हीएमविरोधी ?

News Desk

बिग बींची लोक बिरादरी प्रकल्पाला आर्थिक मदत

Gauri Tilekar
महाराष्ट्र

अर्ध्या तासात शरद पवारांनी उभारला कोटींचा निधी

News Desk

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या दुष्काळी तालुक्यांचा दौरावर आहेत. जलसंधारणाच्या कामाची पहाणी करत असताना, ग्रामस्थांशी चर्चा करताना निधी कमी पडत असल्याचे शरद पवार यांच्या लक्ष्यात आले. त्यानंतर पवार यांनी अवघ्या अर्ध्या तासात साडेसहा कोटींचा निधी उभारला.

श्रमदानातून जलसंधारणाचे काम करुन दुष्काळाचे नामोनिशाण मिटवण्यासाठी लागेल, ती मदत करायला मी तयार आहे, या गावातील लोकांना जमा निधी तत्काळा गावागावात पोहोचावा. या निधीतून डिझेल आणि तांत्रिकीकरणाचे काम करावे, आणखी लागेल ती मदत मी करायला असल्याचे शरद पवार यांनी माण आणि खटावच्या जनतेला सांगितले.

साताऱ्यातील जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक कोटीची मदत करण्याची ग्वाही दिली. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची दीड कोटींची मदत, त्यानंतर मुंबई व पुण्यातील उद्योग जगतातील काही लोकांना मदत करण्यासाठी पवार यांनी विनंत केल्यानंतर त्यांनी दोन कोटीची मदत करण्याचे मान्य केले. अवघ्या अर्ध्या तासाभरात शरद पवार यांना तब्बल साडेसहा कोटीचा निधी जमा केला.

कोणी किती मदत निधी

  • सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक – १ कोटी
  • सातारा जिल्हा परिषद – दीड कोटी
  • सातारा जिल्हा नियोजन समिती – १ कोटी
  • शरद पवार यांच्या खासदार निधीतून – ५० लाख
  • वंदना चव्हाण खासदार निधी – ५० लाख
  • मुंबई, पुणे काही उद्योजक – २ कोटी

Related posts

मला सुद्धा अनेक आजार आहेत, पण त्यामुळे मी मागे हटलो नाही – दीपक म्हैसेकर

News Desk

सत्तेबाहेर असतानाही बाळासाहेब ठाकरेंनी राज्यातील राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला!

News Desk

मावळ गोळीबारावेळी जालियनवाला बाग हत्याकांड का आठवलं नाही? – फडणवीस

News Desk