HW News Marathi
Covid-19

ग्रामीण भागातील विद्यापीठांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेणे कठीणच !  

मुंबई | राज्यातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या ? याबाबतचा पेच अजूनही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकरांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. आज (३० ऑगस्ट) राज्यातील विद्यापीठ आणि परीक्षांचा कुलगुरु समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला आहे. यावेळी, कुलगुरूंच्या समितीने ऑनलाईन परीक्षा पद्धतीतील एक महत्त्वाची समस्या मंडळी आहे. ग्रामीण भागातील विद्यापीठांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेणे कठीण असल्याचे कुलगुरुंनी म्हटले आहे. या कुलगुरूंच्या समितीचा अहवाल उद्या (३१ ऑगस्ट) राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे.

मुंबई, पुणे ही विद्यापीठे वगळता इतर विद्यापीठांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेणे कठीण असल्याचे कुलगुरूंच्या समितीच्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळेच ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत राज्य सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. याचसाठी उद्या पुन्हा (३० ऑगस्ट) कुलगुरुंच्या समितीची आणखी एक बैठक होणार आहे. त्यानंतर, ही समिती राज्य सरकारकडे आपला अहवाल सादर करेल. त्यापुढे राज्य सरकारकडून नेमका काय निर्णय घेतला जातो ? हे पाहणे महत्त्वाचे असेल. दरम्यान “विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत प्राधान्याने विचार करून परीक्षा कशा घेता येतील याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल”, असे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! MPSCची पूर्व परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली

News Desk

सनी लिओनी म्हणते… कोरोनाची परिस्थिती पाहाता माझ्या मुलांसाठी भारतापेक्षा अमेरिका जास्त सुरक्षित !

News Desk

अजित पवारांचं सगळं ऐकता मग ‘हे’ का ऐकत नाही?, सुप्रिया सुळेंकडून कार्यकर्त्यांची कानउघाडणी

News Desk