HW News Marathi
महाराष्ट्र

“पुन्हा कामावर जाण्यातच तुमचं आणि कुटुंबाचं हित”; ST कर्मचाऱ्यांना राऊतांचा सल्ला

मुंबई | “कामगारांनी आता पुन्हा कामावर जाण्यातच त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे हित आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार करावा,” असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. जे भडकवत आहेत ते कुटुंब जगवायाला येणार नाही, असे म्हणत राऊतांनी नाव न घेता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आज (२६ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना टीका केली.

“राज्य सरकारने एसटी कार्मचाऱ्यांना भरघोस वेतन वाढ दिली आहे. कामगारांनी आता पुन्हा कामावर जाण्यातच त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे हित आहे. जे कोणी वकील वगैरे आहेत. ते त्यांचे कुटुंब जगवायला येणार नाहीत. आम्ही मुंबईतील गिरणी कामगारांची अवस्था पाहिली काय झाली होती, ते आमचे मराठी बांधवां आहे. एसटी कर्मचारी सुद्धा मराठी बांधवा आहेत. तेव्हा त्यांनी अत्यंत शांतपणाने आपल्या कुटुंबाचा आणि आपला विचार करावा, आणि निर्णय घ्यावा,” असे भावनिक आवाहन राऊतांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.

एक-दोन लोक नौटंकी करत आहेत

एसटी कर्मचाऱ्यांच्या संप सुरू पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर राऊत म्हणाले, संप सुरू नाही. मला असे वाटते की, त्यांचे जे नेते आहेत. ते तेथून निघून गेले आहेत. आणि बहुसंख्य कर्मचारी कामावर परतले आहेत. काही एक-दोन लोक आहेत. त्यांच्या मागे कामगारांची ताकद नाही, आणि तेच लोक नौटंकी करत आहे. तर त्यांना नौटंकी करू द्या. राज्य सरकारने सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवले आहे. मला असे वाटते अजूनपर्यंत ऐवढा ऐतिहासिक पाऊल कोणत्याच राज्याने घेतले नसेल, असे राऊत म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकी चितळेवर पुण्यातही गुन्हा दाखल, जितेंद्र आव्हाडांची टीका

Aprna

“मी वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी बांधले”

News Desk

#CoronaVirus : राज्यातील सर्व शहरांत कलम १४४ लागू, तर सरकार कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५ टक्के

swarit