HW News Marathi
देश / विदेश

केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार? – जयंत पाटील

मुंबई | देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये असताना केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जागतिक निद्रा दिनानिमित्त केंद्रसरकारला ट्वीटच्या माध्यमातून विचारला आहे.

‘शेतकरी आंदोलनात जवळपास ३००च्यावर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत… तरुण रोज नोकरी गमावत आहेत…दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे…’,अशा प्रश्नांची सरबत्ती जयंत पाटील यांनी केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. यावरुनच जंयत पाटील यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : देशात गेल्या २४ तासांत १००७ कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

तिहेरी तलाक प्रकरणी केंद्र सरकार तोंडघशी

News Desk

लायन एअरवेजचे विमान कोसळले

News Desk